AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इच्छित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना करावी लागणार तारेवरची कसरत, निकालाच्या टक्क्यात वाढ!

यंदाच्या बारावीच्या निकालामध्ये राज्यातील 2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची पास होण्याच्या संख्येमध्ये वाढ झालीये. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे देखील पाहिला मिळते आहे. यामुळे आवडत्या काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार. फक्त एका मुंबई विभागातून 93 हजार 616 विद्यार्थी सायन्स शाखेतून पास झाले आहेत.

इच्छित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना करावी लागणार तारेवरची कसरत, निकालाच्या टक्क्यात वाढ!
Educational LoanImage Credit source: indianexpress.com
| Updated on: Jun 09, 2022 | 8:52 AM
Share

मुंबई : यंदा बारावीचा निकाल चांगला लागला आहे. संपूर्ण राज्यामधील (State) निकालाचा टक्का देखील वाढलाय. यामुळे पदवी प्रवेशात कटऑफमध्ये देखील वाढ होणार हे नक्की. राज्य शिक्षण मंडळाचा निकाल जाहिर झालाय. मात्र, आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डचा निकाल अद्याप लागला नसल्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना (Student) थोडी वाट बघावी लागणार. मेडिकल आणि इंजिनीयरिंग प्रवेशासाठी परीक्षा देखील ऑगस्टमध्ये होणार आहे. यामुळे यंदाही महाविद्यालयांची (College) प्रवेश प्रक्रिया थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्वतली जातेय. विशेष : सायन्स आणि कॉमर्स शाखेच्या टक्क्यामध्ये मोठी वाढ झाल्याने प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्की आहे.

2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी झाले पास

यंदाच्या बारावीच्या निकालामध्ये राज्यातील 2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची पास होण्याच्या संख्येमध्ये वाढ झालीये. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे देखील पाहिला मिळते आहे. यामुळे आवडत्या काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार. फक्त एका मुंबई विभागातून 93 हजार 616 विद्यार्थी सायन्स शाखेतून पास झाले आहेत. तर 1 लाख 55 हजार 911 विद्यार्थी हे कॉमर्स शाखेमधून पास झाले आहेत. कोरोनामध्ये काॅलेजला न जाता विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्वत्र काैतुक केले जात आहे.

राज्यात झाल्या आॅफलाईन परीक्षा

जे विद्यार्थी सीईटीची तयारी करत आहेत, ते लगेचच पदवीसाठी प्रवेश घेण्याची घाई करत नाहीत. जर सीईटीमध्ये मार्क्स कमी आले तर मग व्यावसायिक अभ्यासक्रम, एमसीए, फार्मसी, बीएसी असे पर्याय शोधतात. दोन वर्षांमध्ये कोरोना असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला होता. कोरोनामध्ये लाॅकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना काॅलेज किंवा शिकवणीसाठी घराच्या बाहेर पडणे देखील शक्य नव्हते. आॅनलाईन पध्दतीनेच शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी आॅफलाईन परीक्षा दिल्या. शिक्षण आॅनलाईन झाले आहे तर परीक्षा देखील आॅनलाईनच घ्याव्यात. अशी मागणी काही दिवसांपूर्वी जोर धरू लागली. मात्र, राज्यातील परीक्षा या आॅफलाईनच घेण्यात आल्या.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.