AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इच्छित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना करावी लागणार तारेवरची कसरत, निकालाच्या टक्क्यात वाढ!

यंदाच्या बारावीच्या निकालामध्ये राज्यातील 2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची पास होण्याच्या संख्येमध्ये वाढ झालीये. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे देखील पाहिला मिळते आहे. यामुळे आवडत्या काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार. फक्त एका मुंबई विभागातून 93 हजार 616 विद्यार्थी सायन्स शाखेतून पास झाले आहेत.

इच्छित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना करावी लागणार तारेवरची कसरत, निकालाच्या टक्क्यात वाढ!
Educational LoanImage Credit source: indianexpress.com
| Updated on: Jun 09, 2022 | 8:52 AM
Share

मुंबई : यंदा बारावीचा निकाल चांगला लागला आहे. संपूर्ण राज्यामधील (State) निकालाचा टक्का देखील वाढलाय. यामुळे पदवी प्रवेशात कटऑफमध्ये देखील वाढ होणार हे नक्की. राज्य शिक्षण मंडळाचा निकाल जाहिर झालाय. मात्र, आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डचा निकाल अद्याप लागला नसल्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना (Student) थोडी वाट बघावी लागणार. मेडिकल आणि इंजिनीयरिंग प्रवेशासाठी परीक्षा देखील ऑगस्टमध्ये होणार आहे. यामुळे यंदाही महाविद्यालयांची (College) प्रवेश प्रक्रिया थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्वतली जातेय. विशेष : सायन्स आणि कॉमर्स शाखेच्या टक्क्यामध्ये मोठी वाढ झाल्याने प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्की आहे.

2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी झाले पास

यंदाच्या बारावीच्या निकालामध्ये राज्यातील 2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची पास होण्याच्या संख्येमध्ये वाढ झालीये. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे देखील पाहिला मिळते आहे. यामुळे आवडत्या काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार. फक्त एका मुंबई विभागातून 93 हजार 616 विद्यार्थी सायन्स शाखेतून पास झाले आहेत. तर 1 लाख 55 हजार 911 विद्यार्थी हे कॉमर्स शाखेमधून पास झाले आहेत. कोरोनामध्ये काॅलेजला न जाता विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्वत्र काैतुक केले जात आहे.

राज्यात झाल्या आॅफलाईन परीक्षा

जे विद्यार्थी सीईटीची तयारी करत आहेत, ते लगेचच पदवीसाठी प्रवेश घेण्याची घाई करत नाहीत. जर सीईटीमध्ये मार्क्स कमी आले तर मग व्यावसायिक अभ्यासक्रम, एमसीए, फार्मसी, बीएसी असे पर्याय शोधतात. दोन वर्षांमध्ये कोरोना असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला होता. कोरोनामध्ये लाॅकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना काॅलेज किंवा शिकवणीसाठी घराच्या बाहेर पडणे देखील शक्य नव्हते. आॅनलाईन पध्दतीनेच शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी आॅफलाईन परीक्षा दिल्या. शिक्षण आॅनलाईन झाले आहे तर परीक्षा देखील आॅनलाईनच घ्याव्यात. अशी मागणी काही दिवसांपूर्वी जोर धरू लागली. मात्र, राज्यातील परीक्षा या आॅफलाईनच घेण्यात आल्या.

Follow Us
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान