AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Graduation admission: बारावीचा निकाल जाहीर झाला आता पदवी प्रक्रियाही सुरू

9 जून ते 20 जूनपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. 10 जून ते 20 जून पर्यंत प्रवेशपूर्व नोंदणी अर्जासह प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे.

Graduation admission: बारावीचा निकाल जाहीर झाला आता पदवी प्रक्रियाही सुरू
11th Online Admission
| Updated on: Jun 08, 2022 | 11:44 PM
Share

मुंबई: राज्यात आज बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता खरी गडबड सुरू होणार आहे ती पदवी प्रवेशासाठी. मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai university admission after HSC) पदवी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. पदवी प्रवेश प्रक्रिया (Degree Admission Process) आता 9 पासून म्हणजे उद्यापासूनच पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू (Admission Start) होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आता पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी गडबड सुरू होणार आहे. पदवी प्रवेश प्रक्रियाबाबत आता मुंबई विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार 9 जून ते 20 जूनपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहेत.

9 जून ते 20 जूनपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. 10 जून ते 20 जून पर्यंत प्रवेशपूर्व नोंदणी अर्जासह प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे.

नेहमीप्रमाणे कोकण विभाग अव्वल

या वर्षी बारावीचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालात नेहमीप्रमाणे कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल यंदा प्रचंड कमी झाला आहे. गेल्या वर्षी मुंबई विभागाचा बारावीचा निकाल हा 99.79 टक्के इतका होता. मात्र यंदा मुंबई विभागाचा निकाल हा 90.91 टक्के इतका लागला आहे. त्यामुळे सुमारे दहा टक्क्यांची घट दिसून येत आहे.

 निकाल गेल्या वर्षीपेक्षा तब्बल दहा टक्य्यांनी कमी

मुंबई विभागाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा तब्बल दहा टक्य्यांनी कमी लागला आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात आणि विभागात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. अगदी कॉलेजपासून सर्व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. तरीही मुंबई विभागाचा निकाल कमी होणं ही धक्कादायक बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.