AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2021: पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येत आहे.

JEE Main 2021: पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 10:29 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येत आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे जे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकत नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री काय म्हणाले?

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात यावी, असे आदेश धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांना दिले आहेत. जेईई मेन 2021 सत्र 3 च्या परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी, असं प्रधान म्हणाले. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी 25 ते 27 जुलै दरम्यान होणाऱ्या जेईई मेन जुलै सत्र 3 परीक्षेला पोहोचू शकणार नाहीत त्यांनी चिंता करु नये. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा एक संधी देण्यात येईल. परीक्षेच्या तारखा पुन्हा एकदा जाहीर करण्यात येतील, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत.

सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांचा पाठपुरावा

राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची परिस्थिती लक्षात घेता जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सेशनची परीक्षेला बसण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यासंदर्भात सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी देखील पाठपुरावा केला होता.

आयसीएआयच्या परीक्षेचा पेपर क्रमांक 1 पुन्हा होणार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाँऊटंटस ऑफ इंडियानं इंचलकरंजी, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील 24 जुलै रोजी होणारा फाऊंडेशन परीक्षेचा पेपर क्रमांक 1 प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ अकाऊंटिंग हा पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे. पेपरची तारीख पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे. 26, 28 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या पेपरच्या परीक्षा द्याव्यात, असं आवाहन आयसीएआयनं केलं आहे.

इतर बातम्या:

पालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा , 15 टक्के शुल्क कपात आणि फी वाढ रद्दबाबत राज्य सरकारला निर्देश

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, निकाल कुठे पाहायचा?

Union Education Minister Dharmendra Pradhan said opportunity will gave to flood affected area to appear JEE Main Session Three

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.