JEE Main 2021: पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येत आहे.

JEE Main 2021: पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 10:29 AM

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येत आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे जे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकत नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री काय म्हणाले?

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात यावी, असे आदेश धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांना दिले आहेत. जेईई मेन 2021 सत्र 3 च्या परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी, असं प्रधान म्हणाले. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी 25 ते 27 जुलै दरम्यान होणाऱ्या जेईई मेन जुलै सत्र 3 परीक्षेला पोहोचू शकणार नाहीत त्यांनी चिंता करु नये. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा एक संधी देण्यात येईल. परीक्षेच्या तारखा पुन्हा एकदा जाहीर करण्यात येतील, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत.

सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांचा पाठपुरावा

राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची परिस्थिती लक्षात घेता जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सेशनची परीक्षेला बसण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यासंदर्भात सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी देखील पाठपुरावा केला होता.

आयसीएआयच्या परीक्षेचा पेपर क्रमांक 1 पुन्हा होणार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाँऊटंटस ऑफ इंडियानं इंचलकरंजी, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील 24 जुलै रोजी होणारा फाऊंडेशन परीक्षेचा पेपर क्रमांक 1 प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ अकाऊंटिंग हा पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे. पेपरची तारीख पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे. 26, 28 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या पेपरच्या परीक्षा द्याव्यात, असं आवाहन आयसीएआयनं केलं आहे.

इतर बातम्या:

पालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा , 15 टक्के शुल्क कपात आणि फी वाढ रद्दबाबत राज्य सरकारला निर्देश

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, निकाल कुठे पाहायचा?

Union Education Minister Dharmendra Pradhan said opportunity will gave to flood affected area to appear JEE Main Session Three

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.