Delhi Election Result 2025 : आपचा नाही भाजपचा ‘आपला’ मुख्यमंत्री? सत्ता स्थापनेसाठी AAP-Congress ची होणार आघाडी?
Delhi Election Result 2025 : भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने आहेत. आता काँग्रेस, आप चूक सुधारतील का?

देशाच्या राजधानीत भाजपाचे कमळ फुलत असल्याचे सुरुवातीच्या कलामध्ये समोर येत आहे. येणारे कौल हे आपसाठी धक्कादायक आहेत. भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने आहेत. आता काँग्रेस, आप चूक सुधारतील का?
कलांनी AAP ची उडवली झोप
दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे. दिल्लीकरांनी आपला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे दिसून येते. अर्थात आप अजूनही मैदानात आहे. तरीही भाजपाने मारलेली मुसंडी, ही सत्तेचा वनवास संपणारी दिसत आहे.




कलामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष
कलानुसार, दिल्लीत कमळ फुलणार हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या साईटनुसार, 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यामध्ये भाजप 42 जागांवर तर आप 27 जागांवर तर दुसरीकडे काँग्रेसचे सर्वात वाईट प्रदर्शन म्हणजे केवळ एका जागेवर काँग्रेस दिसत आहे. दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत आपकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आपचे प्रमुख तीन नेत्यांमध्ये मनिष सिसोदीया हे आघाडीवर तर आतिषी आणि अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर दिसत आहेत.
काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर
एक तासानंतरच्या कलानुसार, काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस अजून चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आप सुद्धा अजून मैदानात तग धरून आहे. अरविंद केजरीवाल 1500 मतांनी तर मुख्यमंत्री आतिषी या 673 मतांनी पिछाडीवर आहेत. मनिष सिसोदिया हे आघाडीवर आहेत. भाजपाचे आकडे वाढत असताना, आपचे आकडे संथावले आहेत. गेल्या 12 वर्षांच्या केजरीवाल यांच्या सत्तेला भाजप सुरूंग लावण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे.
आप-काँग्रेस एकत्र येणार?
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी मुसंडी मारली आहे. निकालानंतर जर-तरची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच काँग्रेसच्या पारड्यात अजून काही जागा मिळाल्या आणि सत्ता स्थापनेसाठी आपला काँग्रेसची गरज पडली तर हे दोन पक्ष एकत्र येतील का? याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष आघाडी करतील, एकत्र निवडणूक लढवतील असे वाटत होते. पण तसे झाले नाही. आता जर -तरची परिस्थिती उद्भवल्यास दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी आघाडी करतील का? याचे उत्तर हे निकालच देतील.