AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit polls results 2022 : 2 राज्यात भाजपच्या हातून सत्ता जाणार, एक्झिट पोलचा अंदाज, काँग्रेसची ताकद खरंच वाढणार?

निवडणुकीच्या निकालनंतर दोन राज्यं भाजप गमावणार असल्याचा धोकादायक अंदाज आजच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येईल असा अंदाज आहे.

Exit polls results 2022 : 2 राज्यात भाजपच्या हातून सत्ता जाणार, एक्झिट पोलचा अंदाज, काँग्रेसची ताकद खरंच वाढणार?
दोन राज्यं भाजप गमावणार?Image Credit source: tv9
| Updated on: Mar 07, 2022 | 10:12 PM
Share

Exit Polls 2022 : आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ते पाच राज्याच्या निवडणुकांकडे (Five State Elections 2022) आणि एक्झिट पोलकडे (Exit Polls). पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार उत्तर प्रदेशात भाजपला (UP elections Exit Polls 2022) पुन्हा बहुमत मिळताना दिसतंय. तर पंजाबने आपला कौल दिल्याचा अंदाज समोर आला आहे. या पाच राज्यातल्या सध्या चार राज्यात भाजपची सत्ता आहे. मात्र निवडणुकीच्या निकालनंतर दोन राज्यं भाजप गमावणार असल्याचा धोकादायक अंदाज आजच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येईल असा अंदाज आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा वाजण्याची शक्याता आहे. गोव्यात कुठल्याचा राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत नाहीये. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती तयार होण्याची शक्यात या एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे निकालानंतर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

गोवा भाजप गमावण्याची शक्यता

गोव्यासरखं छोटं मात्र महत्वाचे राज्य भाजप गमावण्याची शक्यता आहे. कारण उत्पल पर्रीकराना तिकीट न देण्यापासून ते अनेक बंडखोरांची आव्हानं थोपवण्याचा प्रश्न भाजपला गोव्यात सोडवावा लागला होता. अखेर आता मतदान पूर्ण झाल्यानं गोव्याचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार गोव्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचं समोर आलं आहे. मात्र सर्वाधिक जागा या सत्ताधारी भाजपलाच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष असेल, तर आपनंही गोव्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आपचा किमान चार जागी विजय होऊ शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे इतरांनी एकत्र येत भाजला धक्का देत महाराष्ट्रासारखी आघाडी झाल्यास भाजपसाठी धोकादायक ठरू शकते

उत्तराखंडचा कौल कुणाला?

उत्तराखंडमध्ये सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजपला 26-32 जागा मिळतील. तर दुसरीकडे काँग्रेसला 32-38 जागा मिळताना दिसत आहेत. तर आम आदमी पक्षाला 2 जागा आणि इतरांना 3-7 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळू शकते. मात्र भाजपही बहुमतापासून दूर नसल्याने येथेही अन्य उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र पाथमिक अंदाजात तर काँग्रेसचे पारडं जड दिसतंय. त्यामुळे ही दोन राज्य भाजप गमावण्याची दाट शक्यता आहे.

Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आप, यूपी-गोव्यात भाजप, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?; …

Goa Election Exit Poll Result 2022 : गोव्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघात कोण बाजी मारणार? जाणून घ्या पणजीसह महत्वाच्या लढतींचा निकाल

UP Election Exit polls Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज, कुणाला किती जागा?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.