AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray : फक्त इतक्या हजारांचा लीड, विधानसभेला वरळी राखणं आदित्य ठाकरेंसाठी सोपं नाही, VIDEO

Aaditya Thackeray : लोकसभा निवडणुकीत वरळीच्या मतदारांनी जो कौल दिलाय, ती आदित्य ठाकरे यांच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा सामना होता. यामिनी जाधव यांना वरळीत मिळालेली मत भाजपाचा उत्साह वाढवणारी आहेत.

Aaditya Thackeray : फक्त इतक्या हजारांचा लीड, विधानसभेला वरळी राखणं आदित्य ठाकरेंसाठी सोपं नाही, VIDEO
Aaditya Thackeray worli Assembly constituency
| Updated on: Jun 06, 2024 | 12:46 PM
Share

दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानाव लागलं. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुंबईत तसेच राज्यात काही मतदारसंघात सेना विरुद्ध सेना असा सामना होता. मुंबईत मविआने चार तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. मुंबई हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गटाने जिकंली. फक्त उत्तर पश्चिम मुंबईत शिंदे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी निवडून आले. मुंबईत तीन जागा जिंकून ठाकरे गटाने आपल वर्चस्व अबाधित राखल असलं तरी वरळीतल मताधिक्क्य चिंता वाढवणार आहे.

वरळी हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. वरळी मतदारसंघ दक्षिण मुंबईत येतो, जिथून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी निवडणूक जिंकली. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना होता. अरविंद सावंत मागच्या दोन टर्मपासून खासदार आहेत. यामिनी जाधव भायखळ्यातून आमदार आहेत. सावंत यांच्या तुलनेत यामिनी जाधव मतदारसंघात तितका ओळखीचा चेहरा नव्हता. अरविंद सावंत यांनी बाजी मारली. पण वरळीतून त्यांना फार मोठ मताधिक्क्य मिळालं नाही. ही चिंतेत टाकणारी बाब आहे. भाजपा वरळीत पूर्ण ताकदीने लढणार हे स्पष्ट

लोकसभेच्या निकालानंतर आता भाजपाने वरळीत बॅनरबाजी सुरु केलीय. भाजपाने मतदारांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. वरळीमधून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना 64 हजार मतं पडली, तर भाजप सेनेच्या यामिनी जाधव यांना 58 हजार मतं मिळाली. अरविंद सावंत यांना वरळीतून फक्त 6,715 मतांचा लीड मिळालं. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करताना ठाकरे गटाला ही चिंतेत टाकणारी बाब आहे. भाजपाने जे बॅनर लावलेत, त्यावर लोकसभेची कसर विधानसभेला भरुन काढू असं लिहिलय. या बॅनरवरुन भाजपा वरळीचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरणार हे स्पष्ट आहे.

Follow Us
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती