AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मोदी, शाह यांचा ग्रीन सिग्नल, कुणी केला दावा ?

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच महायुतीतील शिंदे सरकारच्या एका नेत्यानेही दावा केला असून कॅबिनेटची विस्तार राज्यात करावाच लागेल असे म्हटले आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी दावा केला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मोदी, शाह यांचा ग्रीन सिग्नल, कुणी केला दावा ?
| Updated on: Jun 05, 2024 | 3:25 PM
Share

लोकसभा निवडणुकीत एनडीला बहुमत मिळालं असलं तरी भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपची बरीच पिछेहाट झाली आहे. दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केले जाणार आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच महायुतीतील शिंदे सरकारच्या एका नेत्यानेही दावा केला असून कॅबिनेटची विस्तार राज्यात करावाच लागेल असे म्हटले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे.

कॅबिनेटचा विस्तार महाराष्ट्रात करावाच लागेल, एक लिमिट असते. तुम्ही पूर्ण कॅबिनेट बनवू शकले नाहीत हा शिक्का राहील, त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळाचा हा विस्तार होईल. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल असेही शिरसाट म्हणाले. आज भाजपची अंतर्गत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्याताली भाजपच्या पराभवाची कारणं शोधली जाणार असून मंत्रीमंडळविस्तारासंदर्भातही चर्चा होणार आहे, असे समजते. आगामी विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे, असे वृत्त आहे.

यांसदर्भातच संजय शिरसाट यांनीही भाष्य करत लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केला आहे.

सरकारला कोणताही धोका नाही

लोकसभा निवडणूकीत भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळाले असून आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही दलांच्या बैठकांचा जोर दिल्लीत सुरु झाला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी घाई सुरू झाली आहे. या मुद्यावरी संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. एनडीएचं सरकार स्थापन व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नितेश कुमार , चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू असं काहींना वाटू लागलंय. पण सरकारला कोणताच धोका नाही, 26 पक्षांपेक्षा या चार पक्षाचं सरकार केव्हाही चांगलं. इंडीया सरकार बनवेल असं वाटतं नाही. १० तारखेच्या आत एनडीए सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितिश कुमार इंडिया आघाडीत जाणार नाहीत असे सांगत संजय राऊत लालूच देण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसला

लोकसभा निवडणुकीता राज्यात महायुतीला केवळ अवघ्या १७ जागा मिळाल्या, भाजपचीही पिछेहाट झाली. याची कारणमीमांसा करताना संजय शिरसाट यांनी आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसल्याचे स्पष्ट मत मांडले. सर्व्हे, जागा वाटपात दिरंगाई झालाी त्याचाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. ग्राऊंड लेव्हलला कार्यकर्त्याला महत्व देणं गरजेचे असून ज्या गोष्टी राहिल्या त्यांनी उणीव विधानसभेत भरून काढू असे शिरसाट यांनी सांगितले. सतराचा खतरा वाटत नाही, ताक फुंकून पिऊ, दुध गरम होतं आम्ही ताक समजून पीत होतो. पण मतदारांना गृहीत धरणं चुकीचं आहे, मतदार जागा दाखवतो, असं शिरसाट म्हणाले

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा