AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा निर्णय; बंगालमधील रॅलींबाबत सर्वपक्षीय नेत्यांना केलं ‘हे’ आवाहन

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Rahul Gandhi suspending all his public rallies in West Bengal in view of Covid Situation)

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा निर्णय; बंगालमधील रॅलींबाबत सर्वपक्षीय नेत्यांना केलं 'हे' आवाहन
rahul gandhi
| Updated on: Apr 18, 2021 | 12:03 PM
Share

नवी दिल्ली: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधीनी प्रचारसभा रद्द करण्यासोबत इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांना देखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करण्याचं आवाहन केलं आहे. (Rahul Gandhi suspending all his public rallies in West Bengal in view of Covid Situation)

राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. पश्चिम बंगालसह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मी बंगालमधील माझ्या पुढील सर्व सभा, रोड शो रद्द करत आहेत. कोरोनाची स्थिती पाहता सर्व राजकीय पक्षांनीही मोठ्या सार्वजनिक सभा घेणं टाळाव्यात. कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असं आवाहन राहुल यांनी केलं आहे.

भाजप, टीएमसीची कोंडी

देशभरात कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत आहेत. देशातील अनेक राज्यात तर रुग्णांना बेड्सही मिळत नाहीत. तसेच अनेक राज्यात कोरोनाचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचार रॅलींमुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा विस्फोट होऊ नये म्हणून राहुल यांनी रॅली न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप आणि टीएमसीची मोठी कोंडी झाली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तर ममता बॅनर्जी या राज्याच्या प्रमुख आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हे दोन जबाबदार नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मृतांचा आकडा पाहून राहुल काय म्हणाले?

दरम्यान, गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात 24 तासात 261500 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 1501 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. अशा प्रकारे मरणाऱ्यांची आणि रुग्णांची संख्या पहिल्यांदाच पाहिली आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. (Rahul Gandhi suspending all his public rallies in West Bengal in view of Covid Situation)

संबंधित बातम्या:

West Bengal Election 2021 : मृतदेहांसोबत प्रचार रॅली काढा; ममता बॅनर्जींच्या कथित ऑडिओने खळबळ

West Bengal Election 2021: राहुल गांधींची अखेर बंगालमध्ये एन्ट्री; पहिल्याच सभेत मोदी, ममतादीदींवर टीकास्त्र

प्रचारबंदीनंतरही ममता बॅनर्जी 2 जाहीर सभा करणार! हे कसं शक्य? वाचा सविस्तर

(Rahul Gandhi suspending all his public rallies in West Bengal in view of Covid Situation)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.