AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात छोटी मालिका, 13 भागांमध्ये संपली कथा, पण ठरली सर्वांची आवडती, तुम्ही पाहिली का?

भारतातील सर्वात छोटी मालिका, जिची 13 भागांमध्ये संपली कहाणी. 80 च्या दशकात बनली होती प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका. IMDb रेटिंग देखील मस्त.

भारतातील सर्वात छोटी मालिका, 13 भागांमध्ये संपली कथा, पण ठरली सर्वांची आवडती, तुम्ही पाहिली का?
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 07, 2026 | 2:14 PM
Share

भारतातील टेलिव्हिजनच्या सुरुवातीच्या काळात मुलांसाठी काही वेगळे कार्यक्रम तयार झाले होते. त्या काळात संगणक, अवकाश आणि भविष्यातील तंत्रज्ञान यांसारख्या संकल्पना सामान्य लोकांसाठी खूप नवीन होत्या. तरीही काही मालिकांनी या विषयांना सोप्या आणि रोचक पद्धतीने मांडत प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्या काळात प्रत्येक आठवड्यात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हे कार्यक्रम पाहत असे. त्यामुळे या मालिकांना आजही खास स्थान मिळाले आहे.

त्या काळातील मुलांच्या मालिकांची खासियत म्हणजे त्या केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नव्हत्या. कथानकात मैत्री, कुटुंब, जबाबदारी आणि विज्ञानाशी संबंधित कल्पना सहजपणे गुंतलेल्या असायच्या. याच मालिकांमुळे अनेक कलाकारांना अभिनय क्षेत्रात पहिली संधी मिळाली आणि पुढे ते मोठी नावे बनले. आजही सोशल मीडियावर लोक या जुन्या मालिकांच्या क्लिप्स आणि आठवणी शेअर करताना दिसतात.

मुलांसाठी एक वेगळी मालिका

1989 साली दूरदर्शनवर मुलांसाठी एक वेगळी मालिका प्रसारित झाली होती. इंद्रधनुष नावाच्या या मालिकेत फँटसी आणि विज्ञान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी या मालिकेला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली होती.

या मालिकेत गिरीश कर्नाड, दीपा लागू, अक्षय आनंद आणि विशाल सिंह यांसारखे कलाकार झळकले होते. विशेष म्हणजे प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर यांचा अभिनयातील हा पहिलाच अनुभव होता. या मालिकेत त्यांनी पहिल्यांदाच अभिनय केला होता. काही भागांमध्ये उर्मिला मातोंडकर आणि आशुतोष गोवारिकर देखील झळकले होते.

मालिकेची कथा

इंद्रधनुष या मालिकेची कथा काही शाळकरी मित्रांच्या गटाभोवती फिरते. हे मित्र मिळून आपल्या घरी एक संगणक बसवतात. मात्र तो संगणक अनपेक्षितपणे एका दूरच्या आकाशगंगेतील एलियन राजकुमाराशी संपर्क साधण्याचे माध्यम बनतो.

त्याच्या मदतीने ते वेगवेगळ्या काळात प्रवास करत आपल्या मित्र ‘अप्पू’ला वाचवण्याचा प्रयत्न करतात. अ‍ॅडव्हेंचर, विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा संगम असलेली ही कथा मुलांसाठी खूपच आकर्षक ठरली होती.

फक्त 13 भाग, पण मोठी लोकप्रियता

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मालिकेचे केवळ 13 भाग प्रसारित झाले होते. मात्र एवढ्या कमी भागांमध्येही या मालिकेने प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान मिळवले. काळ जसजसा पुढे गेला तसतसे इंद्रधनुष ही मालिका एक प्रकारची कल्ट-फेव्हरेट ठरली. अनेक माध्यमांनी या मालिकेला ‘त्या काळापेक्षा खूप पुढे असलेली कल्पना’ असेही म्हटले आहे.

विशेषतः करण जोहरच्या तरुणपणीच्या अभिनय पदार्पणामुळेही या मालिकेचा उल्लेख आजही केला जातो. त्या काळात या मालिकेला चांगली टीआरपीही मिळाला होता.

Follow Us
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.