‘धुरंधर’मध्ये दाखवलेला 2001चा संसद हल्ला कसा घडवण्यात आला? अफजल गुरुला फाशी कशी झाली? जाणून घ्या!
२४ वर्षांपूर्वी, २००१ मध्ये १३ डिसेंबरला, पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करून धाडस दाखवले होते. मात्र सुरक्षा दलांनी अतुलनीय शौर्य दाखवत हल्ला उधळून लावला आणि सर्व पाच दहशतवाद्यांना ठार मारले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी घटनेनंतर हा दिवस भारतीय इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला. हा हल्ला चर्चेत असणाऱ्या धुरंधर सिनेमात दाखवण्यात आला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...

गेल्या काही दिवसांपासून धुरंधर हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. साडेतीन तासांच्या या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या प्रत्येक सीनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटात 2001मध्ये संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला दाखवण्यात आला आहे. २४ वर्षांपूर्वी… तारीख होती १३ डिसेंबर २००१ आणि साधारण ११ वाजले होते. संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि विरोधी पक्ष संसदेत कारगिल शवपेटी घोटाळ्यावरून सरकारचा विरोध करत होते. तेव्हाच पाकिस्तानातून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात हल्ला केला. मात्र संसद सुरक्षा सेवा, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांनी हल्ला परतवून लावला आणि सर्व दहशतवाद्यांना मारले. लोकशाहीच्या मंदिरातील या अनपेक्षित दहशतवादी घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याचा उल्लेख चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटात असल्यामुळे त्याविषयी सविस्तर जाणून घेण्याची ईच्छा आहे. चला जाणून घेऊया…
‘कफन चोर….गद्दी छोड़’ अशा घोषणा झाल्या
१३ डिसेंबर २००१ ची सकाळ सर्वसामान्य होती. त्या वेळी कारगिल युद्धादरम्यानच्या शवपेटी घोटाळ्यावरून अटल बिहारी वाजपेयी सरकारला विरोधी पक्षांच्या आरोपांचा सामना करावा लागत होता. विरोधी सांसद हिवाळी अधिवेशनातही या मुद्द्यावर गोंधळ घालत होते. शवपेटी घोटाळ्यावरून ‘कफन चोर, गद्दी छोड़… सेना खून बहाती है, सरकार दलाली खाती है’ असे नारे संसदेत लागत होते. विरोधी पक्षाच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी संसदेतून घरी निघून गेले होते. (सोनिया गांधी त्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या) मात्र, उपपंतप्रधान आडवाणींसह सुमारे २०० खासदार सदन आणि लायब्ररी इथे उपस्थित होते.
वेळ होती ११:४०ची आणि संसदेत घुसली पांढऱ्या रंगाची लाल दिव्याची अॅम्बेसेडर कार
त्या वेळी ११:४० वाजले होते, तेवढ्यात पांढरी अॅम्बेसेडर कार (रजिस्ट्रेशन नंबर DL-3CJ-1527) संसद भवन परिसरात दाखल झाली. कारवर लाल दिवा होता आणि गृह मंत्रालयाचा बनावट स्टिकर लागला होता. त्यात पाच जण बसले होते. परिसरात दाखल झाल्यानंतर कार गेट नंबर १२ कडे वळली, जिथे सीआरपीएफची महिला जवान कमलेश कुमारी तैनात होत्या. त्यांनी पाहिले की गृह मंत्रालयाच्या स्टिकरची कार खूप वेगाने गेट नंबर १२ कडे येत आहे, त्यांना संशय आला, त्यानंतर त्यांनी लगेच वायरलेसवर संशयीत कारची माहिती दिली आणि कार थांबवण्याचा इशारा केला, मात्र दहशतवाद्यांनी थांबण्याऐवजी वेग वाढवला. त्यानंतर कमलेश कुमारी कारकडे धावल्या. दरम्यान, गेट नंबर ११ वर उपराष्ट्रपती कृष्ण कांत यांचे ड्रायव्हर शेखर त्यांच्या सदनाबाहेर येण्याची वाट पाहत होते. काहीही समजण्याच्या आतच दहशतवाद्यांची कार त्यांच्या गाडीला धडकली. त्यानंतर लगेच सर्व दहशतवादी कारबाहेर पडले आणि अंधाधुंद गोळीबार सुरू केला.
सीआरपीएफ-आयटीबीपीच्या जवानांनी केली प्रत्युत्तर कार्रवाई
उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेत तैनात दिल्ली पोलिसांचे जवान, तसेच ड्यूटीवर असलेले सीआरपीएफ आणि आयटीबीपीचे जवान लगेच आपापल्या जागी आले आणि प्रत्युत्तर फायरिंग केली. याच दरम्यान संसद भवनाच्या सुरक्षारक्षकांपैकी मतबर सिंह यांना गोळी लागली. त्यानंतर दहशतवादी गेट नंबर १२ कडे पळाले आणि नंतर संसद भवनाच्या गेट नंबर १ कडे वळाले. गेट नंबर १ वर सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला गोळ्या घातल्या, ज्यामुळे त्याच्या अंगावर बांधलेले स्फोटके फुटले. उरलेले चार दहशतवादी मागे फिरले आणि भवनाच्या गेट नंबर ९ वर पोहोचले. जिथे तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. उरलेला पाचवा दहशतवादी गेट नंबर ५ कडे पळाला, जिथे त्यालाही गोळ्या घालण्यात आल्या.
नऊ सुरक्षारक्षक शहीद झाले
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत नऊ सुरक्षारक्षक शहीद झाले होते. त्यात उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेत तैनात दिल्ली पोलिसांचे चार जवान नानक चंद, रामपाल, ओम प्रकाश आणि घनश्याम यांचा समावेश होता. इतर तीन शहीदांमध्ये सीआरपीएफची महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी, संसद भवनाच्या वॉच अँड वार्ड स्टाफचे सुरक्षा सहायक जगदीश प्रसाद यादव आणि सीपीडब्ल्यूचे नागरी कर्मचारी देश राज, तसेच वॉच अँड वार्ड स्टाफचे सुरक्षा सहायक मतबर सिंह आणि बिजेंद्र सिंह यांचा समावेश होता. तर मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये हैदर उर्फ तुफैल, मोहम्मद राना, रणविजय, हमजा यांचा समावेश होता.
घटनास्थळ आणि कारमधून सापडला शस्त्रास्त्रांचा साठा
दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर घटनास्थळ सील करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉडसह तपास पथकांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली. घटनास्थळावरून अनेक ग्रेनेड सापडले जे लगेच निष्क्रिय करण्यात आले. याशिवाय दहशतवाद्यांच्या कारमधून स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली.
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला संबोधित केले होते
या हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याच दिवशी राष्ट्राला संबोधित केले होते. आपल्या संबोधनात त्यांनी म्हटले होते की संसद ही लोकशाहीची सर्वोच्च प्रतिनिधी संस्था आहे. त्यांनी जाणीवपूर्वक तिलाच लक्ष्य केले. हा हल्ला संसदेवर नव्हे तर संपूर्ण राष्ट्रावर होता. आम्ही हे सुनिश्चित करू की दहशतवादी आपल्या प्रयत्नांत अपयशी ठरतील. गेल्या दोन दशकांपासून आपण दहशतवादाशी लढत आहोत आणि या संकटात संपूर्ण देश आपल्या पाठीशी आहे. यासह त्यांनी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांना सांत्वन व्यक्त केले.
दोन दिवसांनंतर अफजल गुरूसह तीन जणांची अटक
या हल्ल्याने सुरक्षा यंत्रणांचे कान टवकारले. घटनेचा तपास सुरू झाला. त्यात उघड झाले की हे दहशतवादी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. त्यांनी दहशतवादी मसूद अजहरच्या सूचनेनुसार हा हल्ला घडवला. प्रकरणात तपासाचे धागे अफजल गुरू, त्याचा भाऊ शौकत हुसैन गुरू आणि प्रा. एस.ए.आर. गिलानी यांच्याशी जोडले गेले. हल्ल्यानंतर दोन दिवसांतच तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पोटा (Prevention of Terrorism Act) अंतर्गत खटला चालवला गेला.
हल्ल्यानंतरचा घटनाक्रम वर्षानुवर्षे
२५ डिसेंबर २००१
तपासात हल्ल्याची कडी मसूद अजहरशी जोडली गेली. त्यानंतर पाकिस्तानने त्याची औपचारिक अटक केली.
१८ डिसेंबर २००२
नवी दिल्लीतील ट्रायल कोर्टाने हल्ल्याचे प्लानिंग करणे, दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवणे आणि मदत करण्याच्या आरोपावर अफजल गुरू, त्याचा भाऊ शौकत हुसैन आणि एस.ए.आर. गिलानी या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली.
२९ ऑक्टोबर २००३
त्यानंतर तिघांनी फाशीच्या शिक्षेला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले. अनेक सुनावणीनंतर हायकोर्टाने गिलानी यांना निर्दोष सोडले. तर अफजल गुरू आणि शौकत यांची शिक्षा कायम ठेवली.
४ ऑगस्ट २००५
त्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले, जिथे शौकतची शिक्षा १० वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. मात्र कोर्टाने अफजल गुरूची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
१२ जानेवारी २००७
त्यानंतर अफजल गुरूने फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली, जी १२ जानेवारी २००७ रोजी फेटाळली गेली. त्यानंतर अफजल गुरूची पत्नी तबस्सुम गुरू यांनी ऑक्टोबर २००६ मध्ये राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. त्यात म्हटले होते की अफजल गुरूला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवले आहे. मात्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ३ फेब्रुवारी २०१३ रोजी ती दया याचिका फेटाळली.
९ फेब्रुवारी २०१३
त्यानंतर ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात अफजल गुरूला फाशी देण्यात आली. मात्र त्याला फाशी मूळात एक दिवस आधी म्हणजे नऊ फेब्रुवारीला देण्यात येणार होती. पण सुरक्षा कारणांमुळे ती एक दिवस पुढे ढकलली गेली होती. त्या वेळचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्र ‘फाइव डिकेड्स इन पॉलिटिक्स’ मध्ये याचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी सांगितले की असे करण्यामागचे मुख्य उद्देश सुरक्षा कायम ठेवणे होते. खरे तर सरकारला भीती होती की अफजल गुरूच्या फाशीच्या बातमीने जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडू शकते. त्याच कारणाने अत्यंत गुप्त पद्धतीने दिल्लीच्या तिहार तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली होती.
धुरंधर चित्रपटामध्ये या हल्ल्याचे काही खरे फुटेज वापरण्यात आले आहे. या हल्ल्याच्या सीन्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटामुळे 2001चा दहशतवादी हल्ला चर्चेत आला आहे.
