AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

A.R.Rahman : तोंड बंद… ए.आर.रहमानचे रणवीर अलाहबादियावर टीकास्त्र, विकी कौशलही थक्क

छावा चित्रपटाच्या म्युझिक अल्बम लाँचच्या वेळी, कोणाचेही नाव न घेता, संगीतकार ए.आर. रहमान यांनी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या मुद्द्यावरून खरपूस समाचार घेत टीका केली. त्याचा शालजोडीतला टोमणा इतका भन्नाट होता की ते ऐकून विकी कौशललाही हसू आवरता आलं नाही.

A.R.Rahman : तोंड बंद... ए.आर.रहमानचे रणवीर अलाहबादियावर टीकास्त्र, विकी कौशलही थक्क
ए.आर.रहमान
| Updated on: Feb 13, 2025 | 3:38 PM
Share

प्रख्यात संगीतदिग्दर्शक ए.आर.रहमान हे कॉन्ट्रोव्हर्सीपासून नेहमी दूर असतात. ना ते एखाद्या वादात अडकतात ना कोणत्याही वादावर कमेंट करतात. पण मुंबईत नुकताच ‘छावा’ चित्रपटाचा म्यूझिक आल्बम लाँच सोहळा पार पडला, तेव्हा देशातील हे सर्वात प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एक विधान करण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी कोणाचंही नाव न घेता समय रैना आणि रणवीर अलाहबादियावर चांगलीच टीका केली. त्यांचा तो शालजोडीतला आहेर ( टोमणा) ,ऐकून विकी कौशलच नव्हे तर या सोहळ्यासाठी आलेले लोकही खोखो हसू लागaले.

समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमात आलेल्या रणवीर अहलाबादियाने आई-वडिलांवरून एक कमेंट करत प्रश्न विचारला होता, ज्यामुळे संपूर्ण देशात गदारोळ झाला. अनेकांनी त्यावर टीकरा केली, दिग्गज कलाकारांनी सुद्धा त्यावर नाराजी वर्तवली होती. या सगळ्या प्रकरणानंतर रणवीरने एका व्हिडीओद्वारे माफीही मागितली होती. मात्र अजूनही हे प्रकरण तापलेलंच असून आता ए.आर. रहमान यांनीदेखील रणवीरवर टीका केली आहे. तोंड उघडलं की काय घडतं हे आपण पाहिलंच आहे, असे म्हणत त्यांनी कोणाचेच नाव न घेता या संपूर्ण प्रकरणावर टिपण्णी केली.

नेमकं काय झालं ?

खरंतर,’छावा’ चित्रपटाच्या म्युझिक अल्बम लाँचच्या वेळी विकी कौशलने एआर रहमान यांना काही प्रश्न विचारले. त्यातील एक प्रश्न असा होता की जर तुम्हाला तुमच्या संगीताचे इमोजीद्वारे वर्णन करायचे असेल तर तुम्ही कोणती इमोजी वापराल? तेव्हा ए.आर.रेहमान म्हणाले की मी माझ्या संगीतासाठी फक्त त्या इमोजीचा वापर करेन, ज्यामध्ये तोंड बंद असलेलं दिसंत. पुढे रेहमान म्हणाले की ” तोंड बंद ठेवणंच योग्य ठरेल. कारण जेव्हा तोंड उघडतो तेव्हा काय होऊ शकतं, हे आपण सर्वांनीच गेल्या आठवड्यात पाहिलं आहे.”

एआर रहमान यांचं हे बोलणं ऐकून सर्वजण काही सेकंदांसाठी स्तब्ध झाले आणि मग विकी कौशलसह सगळेच खोखो हसू लागले. ए आर रेहमान म्हणाले की त्यांच्या संगीतासाठी इमोजी वापरायचं असेल तर ते तोंड बंद असलेले तीन इमोजी वापरतील.कोणाचंच नाव न घेता पण बरोब्बर लगावलेल्या या टोल्यावने सर्वांनाच हसू फुटलं. काल रात्री मुंबईत झालेल्या छावाच्या म्युझिक लाँच कार्यक्रमात एआर रहमान यांनी स्वतः छावाची काही गाणी स्टेजवर लाइव्ह सादर केली. त्यांच्या संगीताचे कौतुक करताना विकी कौशल म्हणाला की ए आर रहमाननी आपल्या चित्रपटाचे संगीत तयार करावे हे त्याचे नेहमीच स्वप्न होते आणि हे स्वप्न ‘छावा’च्या माध्यमातून प्रथमच पूर्ण होणार आहे, असेही त्याने नमूद केलं.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.