AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay Karte मालिकेत उत्कंठावर्धक वळण

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?
Madhurani Prabhulkar, Omkar Gowardhan
| Updated on: Feb 23, 2022 | 6:04 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती (Arundhati) ही रेकॉर्डिंगसाठी मुंबईबाहेर गेली आणि तिथे काही अडचणी आल्यामुळे तिला तिचा मित्र आशुतोषसोबत (Ashutosh) बाहेर रात्र काढावी लागली. या घटनेनंतर अनिरुद्ध आणि कांचन देशमुख तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. अरुंधती अखेर देशमुख कुटुंबातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते. तिच्या या निर्णयाचं प्रेक्षकांकडून, चाहत्यांकडून बरंच कौतुक झालं. दुसरीकडे याच परिस्थितीचा फायदा घेत संजना ही कांचन देशमुखांना अरुंधतीविरोधात भडकवते. भररस्त्यात कांचन देशमुख अरुंधतीला तिचा घरावरचा हक्क सोडायला भाग पाडतात. अरुंधतीसुद्धा मागचापुढचा विचार न करता घरावरील तिचे हक्क सासूंच्या नावे करते. यानंतर आता मालिकेत आणखी मोठा ट्विस्ट येणार आहे.

देशमुखांच्या घराबाहेर पडल्यानंतर अरुंधती पुढे कोणतं पाऊल उचलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. बुधवारी प्रसारित होणाऱ्या भागात अरुंधती तिच्या आईच्या घरी जाते. यावेळी आई आणि सुधीर अरुंधतीची बाजू घेत तिच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगतात. त्यानंतर यश, नितीन आणि आशुतोष हे अरुंधतीला भेटायला येतात. ‘माझं चुकलं, मी काहीही सहन करेन, करते, असा समज मी करून दिला होता त्यांचा…’ असं म्हणत अरुंधतीसुद्धा तिच्या निर्णयावर ठाम राहते. दुसरीकडे विशाखा आणि केदार हे अनिरुद्ध आणि कांचन यांची चांगलीच कानउघडणी करतात.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आशुतोष देणार अरुंधतीवरील प्रेमाची कबुली मालिकेच्या पुढील भागांत आशुतोष हा अखेर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली चक्क देशमुख कुटुंबीयांसमोर देणार आहे. आता त्यावर देशमुख कुटुंबीय, विशेषकरून अनिरुद्ध आणि कांचन यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इतकंच नव्हे तर अरुंधतीला समजल्यानंतर ती काय बोलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून असेल. अरुंधती आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करणार की त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांत पहायला मिळेल.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.