AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aakhri Sach | घरातील सदस्यच होता व्हिलेन? बुराडी कांडवर आधारित सीरिजमध्ये मोठा खुलासा

अभिनेत्री तमन्ना भाटियाची वेब सीरिज सध्या चर्चेत आली आहे. 'आखिरी सच' असं या सीरिजचं नाव असून बुराडी कांडवर ती आधारित आहे. या सीरिजची कथा तिसऱ्या एपिसोडमध्ये अत्यंत नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे.

Aakhri Sach | घरातील सदस्यच होता व्हिलेन? बुराडी कांडवर आधारित सीरिजमध्ये मोठा खुलासा
Tamannah BhatiaImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 02, 2023 | 10:37 PM
Share

मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाची ‘आखिरी सच’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजची चर्चा यासाठी होतेय कारण ती बहुचर्चित बुराडी कांडवर आधारित आहे. या सीरिजमध्ये अत्यंत नाट्यमय पद्धतीने त्या घराची कहाणी दाखवण्यात आली आहे, जिथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी आत्महत्या केली होती. ही नेमकी आत्महत्या होती की हत्या त्याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. मात्र या प्रकरणाच्या तपासादरम्यान मिळालेल्या तथ्यांच्या आधारावर विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. आखिरी सच या वेब सीरिजच्या आधी बुराडी कांडवर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक माहितीपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव हाऊस ऑफ सिक्रेट्स असं होतं. आता ‘आखिरी सच’च्या निमित्ताने पुन्हा एकदा ही केस चर्चेत आली आहे.

तिसऱ्या एपिसोडमध्ये काय दाखवलं?

या सीरिजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये कथा थोडी पुढे सरकते, मात्र ती एका अशा गूढ वळणावर थांबते, ज्यावर विश्वास ठेवणं कोणासाठीही कठीण असेल. सीरिजमध्ये या केसचा तपास सुरू असून त्यादरम्यान बरेच लोकांवर संशय निर्माण केला जातो. यामध्ये घरातील एका सदस्याचाही समावेश आहे. ‘आखिरी सच’मध्ये अभिनेता अभिषेक बॅनर्जी जी भूमिका साकारतोय, ती फार रहस्यमयी आहे. जसजशी सीरिजची कथा पुढे सरकतेय, तसतसं अभिषेकच्या वागणुकीत बदल होताना दिसतंय. त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की 11 लोकांच्या मृत्यूप्रकरणाशी त्याचा नक्कीच कोणता तरी संबंध आहे.

सीरिजच्या कथेतून हळूहळू एक-एक गोष्ट उलगडत जातेय आणि प्रत्येक घटनाक्रमातून ठराविक संदेश मिळत आहेत. मात्र आतासुद्धा क्राइम ब्रांच पूर्णपणे संभ्रमात आहे. या खटल्याचं मूळ त्यांनाही अजून सापडलं नाही. त्यासाठी या एपिसोडच्या पुढच्या एपिसोडची प्रतीक्षा करावी लागेल.

‘आखिरी सच’ ही वेब सीरिज 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाली. या सीरिजचे आतापर्यंत तीन एपिसोड्स प्रदर्शित झाले आहेत आणि इतर तीन एपिसोड्स एक-एक करून दर शुक्रवारी प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये तमन्ना भाटियासोबतच अभिषेक बॅनर्जी, कृती विज, शिविन नारंग, सलीम सिद्दिकी, दानिश इकबाल आणि फिरदौस हसन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......