AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता त्यांनी विभक्त व्हायला हवं…’, अभिषेक बच्चन याने काढली साखरपुड्याची अंगठी? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अभिनेत्याने काढली साखरपुड्याची आंगठी? चाहते म्हणाले...; सोशल मीडियावर सध्या सर्वत्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा... मोठी अपडेट समोर...

'आता त्यांनी  विभक्त व्हायला हवं...', अभिषेक बच्चन याने काढली साखरपुड्याची अंगठी? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
| Updated on: Dec 02, 2023 | 3:13 PM
Share

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं कपल बॉलिवूडच्या बेस्ट कपल पैकी एक होतं. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा असयाची. एक काळ असा होता, जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्या दोघे चाहत्यांना कपल गोल्स देत होते. पण गेल्या काही दिवसांपासून सतत अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पूर्वी प्रत्येक ठिकाणी अभिषेक आणि ऐश्वर्या कोणत्याही कार्यक्रमात लेक आराध्या हिच्यासोबत उपस्थित राहायचे. पण आता ऐश्वर्या कायम मुलीसोबत दिसते. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, अभिषेक बच्चन याचे साखरपुड्याची आंगठी काढून फोटोशूट केल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

दरम्यान, एका Reddit यूजरने अभिषेक बच्चन याचे काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्या बोटात अंगठी दिसत नसल्याचं समोर येत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे.

फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘घटस्फोट देऊन आता त्यांनी पुढे जायला हवं..’, ‘फोटोमध्ये अभिषेक याने अंगठी घातलेली नाही नाही तर, तो कायम अंगठी घायालचा…’ याआधी देखील अनेक कारणांमुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा रंगली. पण यावर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या हिचा वाढदिवस होता. तेव्हा अभिषेक याने फक्त ऐश्वर्या हिचा एकटीचा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढंच नाही तर, ऐश्वर्या हिच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं. अभिनेत्रीने फक्त आई आणि लेक आराध्या हिच्यासोबत वाढदिवस साजरा केला.

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये अभिनेत्रीने आराध्या हिला जन्म दिला.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या फक्त पती अभिषेक याला फॉलो करते. तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.