अक्षय कुमारसोबत ‘केसरी’मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

केसरी यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहर यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या अभिनेत्यानं आपल्या फेसबुकवर अत्यंत भावूक पोस्ट लिहून जीवन संपवलं आहे.

अक्षय कुमारसोबत 'केसरी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 10:48 PM

मुंबई : बॉलिवूडला एका पाठोपाठ एक मोठे झटके बसत आहेत. आता अजून एका अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. अल्ट बालाजीसोबत काम केलेला, एमएस धोनी, केसरी यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहर यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या अभिनेत्यानं आपल्या फेसबुकवर अत्यंत भावूक पोस्ट लिहून जीवन संपवलं आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.(Actor Sandeep Nahar committed suicide)

मृत्यूपूर्वी अभिनेत्याची भावनिक पोस्ट

अभिनेता संदीप नाहरने मृत्यूपूर्वी फेसबुकवरील पोस्टमध्ये आता जगण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. “जीवनात अनेक सुख-दु:ख पाहिली. प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी ज्या अवस्थेतून जात आहे ते सहन करण्यापलीकडे आहे. मला माहिती आहे की आत्महत्या करणं हे कायरतेचं लक्षण आहे. मलाही जगायचं होतं. पण अशा जगण्याला काय अर्थ जिथे शांतता आणि स्वाभिमान नाही. माझी बायको कांचन शर्मा आणि तिची आई वुनू शर्मा यांनी ना मला समजून घेतलं ना समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझी बायको शिघ्रकोपी आहे. तिचं व्यक्तीमत्व आणि माझं व्यक्तीमत्व वेगळं आहे, जे मॅच होऊ शकत नाही”, अशी पोस्ट अभिनेता संदीपने केली होती.

“रोज सकाळ संध्याकाळ भांडण. आता माझ्यात ऐकण्याची शक्ती नाही. त्यात कांचनची काही चूक नाही. तिचा स्वभावच तसा आहे. तिला सर्वकाही नॉर्मल वाटतं, पण माझ्यासाठी हे सगळं नॉर्मल नाही. मी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मी खूप वाईट वेळ पाहिली पण कधी अडलो नाही. डबिंग केली. जिम ट्रेनर राहिलो. वन रुम किचनमध्ये आम्ही 6 जण राहत होतो. स्ट्रगल होतं पण समाधान होतं. आज मी खूप मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात खूप काही बदललं आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला वाटतं की सर्वकाही ठिक सुरु आहे. कारण ते फक्त आमच्या सोशल पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळं खोटं आहे. जगाला चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सगळं खोटं आहे”, असंही संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

इतकच नाही तर संदीपने आपल्या पोस्टमध्ये बायकोच्या त्रासाबद्दल खूप सांगितलं आहे. पण मला वाटतं की मी गेल्यानंतर तिला कुणी काही बोलू नये. कारण, तिला कधीही आपल्या चूक कळणार नाही, असंही संदीपने म्हटलंय.

इतर बातम्या :

तीन मर्डर करेन, हिंमत असेल तर पकडून दाखवा, हकालपट्टी होताच शिपायाची पोलिसांना धमकी

दुसरं लग्न का केलं? भावा-भावातील वाद टोकाला, हत्याकांडाने अमरावती थरारलं

Actor Sandeep Nahar committed suicide

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.