बॉलिवूड कलाकार मराठी कलाकारांना घाटी म्हणून.. मराठी अभिनेत्याचा याचा धक्कादायक खुलासा, थेट..
अभिनेता वैभव मांगले याने केलेल्या आरोपाने एकच खळबळ उडाली. थेट बॉलिवूडवर हे आरोप करण्यात आली. मराठी कलाकारांना कशाप्रकारची वागणूक दिली जाते, यावर थेटपणे बोलण्यात आले. हेच नाही तर मराठी कलाकारांना कसे हिणवले जाते हे देखील सांगितले.

अभिनेता वैभव मांगले याने त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. वैभव मांगलेने बॉलिवूडवर अत्यंत गंभीर आरोप केले, त्याने एकच खळबळ उडाली. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकाराला नक्की काय समजतात आणि काय बोलतात यावर थेट भाष्य केले. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मराठी कलाकारांना कशाप्रकारे वागणूक देतात, यावर ते थेटपणे बोलला. हेच नाही तर सिनेसृष्टीत कलाकार मराठी कलाकारांना थेट घाटी समजतात. तिथे कोणीही मराठी कलाकाराला हिरो किंवा हिरोईन बनू देत नाहीत. यादरम्यानच वैभवने माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्याही नावाचा उल्लेख केला. त्या इंडस्ट्रीनं भूरळ आपल्याला कधीही घातली नसल्याचेही त्याने म्हटले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वैभव मांगलेने खळबळ उडवणारे आरोप केले.
वैभव मांगले याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मराठी कलाकार हिंदीत चमकले, चमकणार आणि चमकतील हे फालतू कोडकाैतुक पहिले बंद करा. तिथे आपण चमलो म्हणजे आपण भारी कलाकार? हा सर्व बिनडोकपणा आहे. लोक आणि हिंदीत नाव कमावलं म्हणून कुणी मराठी रसिक हिंग लावून विचारतं नाही त्याला…मराठीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या भूमिकाच तिथे फक्त मराठी कलाकारांना देतात.
माधुरी आणि नाना पाटेकर यांना सोडून कोणालाही किंमत देत नाहीत. घाटी म्हणून मराठी कलाकारांना संबोधतात. त्यांनी पुढे म्हटले की, तिथे एक आकस आहे, कलाकारांबद्दल. कधीही किंमत दिली जा नाही मराठी कलाकारांना… आमचे अस्सल ते अव्वल फालतुगिरी… प्रशांत दामले, उमेश कामत, प्रिया बापट, भरत जाधव, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक, स्पृहा… खूप महत्वाचे आणि खूप खूप मोठे कलाकार आहेत. धन्यवाद…
वैभव मांगलेंची सोशल मीडिया पोस्ट..
त्यांनी पुढे कंसात लिहिले की, आता काही महाभाग म्हणतील की, याला कुणी काम दिले नाही वाटतंय म्हणून हे सुचतंय.. पण सांगून ठेवतो मला कधीची त्या इंडस्ट्रीनं भूरळ घातली नाही. किवा तिथे काही भारी वाटले नाही. आता वैभव मांगलेची पोस्ट तूफान व्हायरल होत आहे. यापूर्वीही अनेक कलाकारांनी अशाचप्रकारची गंभीर आरोप केली आहेत.