AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?

महाभारतात द्रौपदीच्या भूमिका करणाऱ्या रुपा गांगुली यांना कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. द्रौपदीच्या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. त्या राज्यसभा सदस्य ही आहेत. कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस स्टेशनसमोर धरणं आंदोलन सुरु केले होते.

महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 03, 2024 | 8:16 PM
Share

बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या रुपा गांगुली (Rupa ganguly) यांनी अटक करण्यात आली आहे. त्या माजी राज्यसभा सदस्य आहेत. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. स्थानिक महिला भाजप नेत्या रुबी दास यांच्या सुटकेच्या मागणीसाठी रुपा गांगुली या पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करत होत्या. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांच्या त्यांच्या सह इतर भाजप कार्यकर्त्यांना देखील अटक केली आहे. शाळकरी मुलाच्या मृत्यूच्या निषेधार्थ भाजप नेते आंदोलन करत होते. मुलाला पेलोडरची धडक बसली. कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कर्मचारी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्याचा वापर करत होते.

पोलीस स्टेशन समोर धरणं आंदोलन

भाजप कार्यकर्त्यांना अटक झाल्याची माहिती मिळताच रुपा गांगुली या दक्षिण कोलकाता येथील स्थानिक बांसद्रोणी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी दास यांच्या सुटकेची मागणी केली. पोलिसांच्या या कारवाई विरुद्ध त्या पोलीस स्टेशन समोरच धरणे आंदोलन करत होत्या.

रुपा गांगुली यांनी दावा केला की, दास आणि इतर भाजप समर्थक शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्यावर स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलकांनाच अटक केली आहे.

शाळकरी मुलांच्या मृत्यूने संताप

रुपा गांगुली या रात्रभर धरणे आंदोलनाला बसल्या आणि अखेर गुरुवारी सकाळी १० वाजता कोलकाता पोलिसांनी त्यांना अटक केली. काही वेळातच त्याला पोलीस वाहनातून बांसद्रोणी पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर नेण्यात आले. अटक केल्यानंतर गांगुली यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी त्यांना बॅगही घेऊ दिली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गांगुली यांना अटक करण्यात आली आहे.

शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवक अनिता कर मजुमदार या घटनेनंतर अनेक तास होऊन गेल्यानंतर ही पोहोचल्या नाही, त्यामुळे स्थानिक लोकं संतप्त झाले. रूपा गांगुली यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत काम केले आहे. ‘महाभारत’मध्ये साकारलेल्या द्रौपदीच्या भूमिकेने त्यांना घराघरात ओळख दिली. नंतर त्या भाजपमध्ये दाखल झाल्या आणि राज्यसभा सदस्यही राहिल्या आहेत.

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?