AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोई नहीं ते अपनी कहानी… कॉफी, रस्ते, झरे, डोंगरदऱ्या… वैभवीचा शेवटचा काळीज हेलावणारा व्हिडिओ पाहिला का?

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. फिरायला गेलेली असताना झालेल्या कार अपघातात तिचा जीव गेला.

कोई नहीं ते अपनी कहानी... कॉफी, रस्ते, झरे, डोंगरदऱ्या... वैभवीचा शेवटचा काळीज हेलावणारा व्हिडिओ पाहिला का?
Image Credit source: instagram
| Updated on: May 24, 2023 | 3:59 PM
Share

मुंबई : मृत्यूचा काहीच भरोसा नाही. कधी येऊन कोणाला घेऊन जाईल ते कळत नाही. आदित्या सिंग राजपूतनंतर टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे कार अपघातात निधन झाले. वैभवीने (vaibhavi upadhyay) वयाच्या 32 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. खरंतर वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हिमाचल प्रदेश येथे फिरायला गेली होती. ते दोघेही २३ मे रोजी तीर्थन घाटी येथे जात होते, तेथेच त्यांच्या कारचा अपघात झाला. डोंगराळ भागातील तीव्र वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने वैभवीची कार ५० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. तर तिचा होणारा नवरा सुरेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना फारशी गंभीर दुखापत झालेली नाही.

वैभवी ही गुजराती थिएटर सर्कलमध्ये प्रसिद्ध होती. साराभाई व्हर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकेतील तिची जास्मिनची भूमिका खूप गाजली होती. वैभवीला डोंगर, दऱ्यांमध्ये फिरायला खूप आवडायचं आणि तिचा शेवटचा इन्स्टाग्राम व्हिडीओही हिमाचल प्रदेश येथील होता.

दीपिका पडूकोण सह केले होते चित्रपटात काम

वैभवीने साराभाई मालिकेशिवाय इतर अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्येही काम केले होते. दीपिका पडूकोण हिच्यासह छपाक या चित्रपटात तिने स्क्रीन शेअर केली होती. त्यामध्ये तिची महत्वपूर्ण भूमिका होती. तसेच राजकुमार राव आणि टिमरी अभिनीत सिटी लाइट्स सारख्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपटातही तिने काम केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार तिचे नेटवर्थ १० लाख डॉलर्स इतके होते. तिचा नुकताच सुरेश गांधी यांच्याशी साखरपुडा झाला होता व दोघेही लवकरच लग्नही करणार होते

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.