AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘PAK आर्मीने आमच्या देशाला उद्ध्वस्त केलं’; अदनान सामीसमोर पाकिस्तानी मुलांनी बोलून दाखवली खदखद

अझरबैजानमध्ये फिरत असताना गायक अदनान सामीची भेट काही पाकिस्तानी मुलांशी झाली. या मुलांनी अदनानकडे आपली खदखद बोलून दाखवली. आम्ही आमच्या देशाचा द्वेष करतो, पाकिस्तानी सैन्याने आमच्या देशाला बर्बाद केलंय, असं ते म्हणाले.

‘PAK आर्मीने आमच्या देशाला उद्ध्वस्त केलं’; अदनान सामीसमोर पाकिस्तानी मुलांनी बोलून दाखवली खदखद
गायक अदनान सामीImage Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2025 | 1:29 PM
Share

“सर तुम्ही योग्य वेळी पाकिस्तान सोडलात, आम्हालाही आमचं नागरिकत्व बदलायचं आहे”, असं काही पाकिस्तानी मुलांनी सांगितल्याचा खुलासा प्रसिद्ध गायक अदनान सामीने केला. याविषयीची पोस्ट त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिली आहे. आम्ही पाकिस्तानी सैन्याचा द्वेष करतो, कारण सैन्याने देशाला उद्ध्वस्त केलंय, असंही तरुणांनी म्हटल्याचं अदनान सामीने नमूद केलंय. अदनानकडे आधी पाकिस्तानचं नागरिकत्व होतं. काही वर्षांपूर्वी तो भारतात आला आणि त्याने इथलं नागरिकत्व मिळवलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अदनान सामीने केलेलं हे ट्विट विशेष चर्चेत आलं आहे.

अदनान सामीचं ट्विट-

‘अझरबैजानच्या बाकूमधील सुंदर रस्त्यावर चालताना काही पाकिस्तानी मुलांशी भेट झाली. ते म्हणाले, सर, तुम्ही खूप नशीबवान आहात. आम्हालाही आमचं नागरिकत्व बदलायचं आहे. आम्ही आमच्या सैन्याचा द्वेष करतो, त्यांनी आमच्या देशाला उद्ध्वस्त केलंय. त्यावर मी त्यांना प्रतिक्रिया दिली की, मला हे खूप आधीच समजलं होतं’ असं अदनाने लिहिलं आहे.

अदनानचा जन्म लंडनमध्ये झाला असून त्याचे वडील पाकिस्तानी आणि आई भारतीय आहे. 2001 पासून तो भारतात राहू लागला असून डिसेंबर 2015 मध्ये त्याला भारताचं नागरिकत्व मिळालं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हा पाकिस्तानचे माजी माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी अदनान सामीचा उल्लेख करत त्याच्या राष्ट्रीयत्वावरून सवाल उपस्थित केला होता. फवाद यांच्या या पोस्टवर अदनानने सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘या अडाणी मूर्ख व्यक्तीला कोण सांगणार?’ असं ट्विट त्याने केलं होतं.

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यावेळी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले असून 20 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा अदनान सामीनेही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?