AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्याचा 18 वर्षानंतर होणार घटस्फोट, कोर्टात दाखल केला अर्ज

बॉलिवूडमध्ये आतापर्यत अनेक जोडप्यांचा घटस्फोट झाला आहे. बॉलिवूडसाठी हे नवं नाही. पण यामुळे चाहत्यांना नक्कीच धक्का बसतो. चाहते आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे निराश होतात. पण अखेर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असतो.

ऐश्वर्याचा 18 वर्षानंतर होणार घटस्फोट, कोर्टात दाखल केला अर्ज
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 09, 2024 | 7:08 PM
Share

Aishwarya Divorce : रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि जावई धनुष यांनी 2 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून दोघेही वेगळे राहत आहेत. आता या जोडप्याने चेन्नई फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या दोन्ही स्टार्स कलम 13B अंतर्गत घटस्फोट घेत आहेत. त्यांच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होऊ शकते.

18 वर्षांनंतर मोडले लग्न

धनुष आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत. त्यांनी 2022 मध्ये वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. 2 वर्षे वेगळे राहिल्यानंतर त्यांनी आता घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

View this post on Instagram

A post shared by @surya_dhanush_rasigan

धनुषने ट्विट केले होते की- ‘१८ वर्षांचा प्रवास छान राहिलाय. पण आता आम्ही जिथे उभे होतो तिथून मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय.’ धनुषचे हे ट्विट त्यावेळी चांगलेच व्हायरल झाले होते. धनुष आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी मोठा धक्का होती. ही जोडी पुन्हा एकत्र येईल अशी चाहत्यांना आशा होती. पण तसे झाले नाही. दोघांना दोन मुलं आहे.

ऐश्वर्याने सोशल मीडियवर एक पोस्ट शेअर केली होते. विभक्त होण्याच्या संघर्षात दोघांनीही लोकांना त्यांची गोपनीयता राखण्याचे आवाहन केले आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांनी 2004 मध्ये विवाह केला होता. तेव्हा त्यांचे वय 21 आणि 23 वर्ष होते. पण वेगळे झाल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलेय. धनुष त्याच्या आगामी चित्रपट आणि दिग्दर्शनात व्यस्त आहे. ‘रायन’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे.

ऐश्वर्या हिने अलीकडेच ‘लाल सलाम’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन केले आहे. तर ‘कॅप्टन मिलर’ सिनेमामधून धनुष शेवटचा दिसला होता.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.