AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… यासाठी ऐश्वर्या राय काय करते? जपते फार जुनी परंपरा

Aishwarya Rai Bachchan: सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश... कायम राहावं म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या राय करते 'या' दागिन्याचा वापर! तामिळनाडू येथील फार जुन्या परंपरेचा अभिनेत्री आजही करते पालन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा...

सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश... यासाठी ऐश्वर्या राय काय करते? जपते फार जुनी परंपरा
| Updated on: Jul 26, 2024 | 9:02 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या खासगी आयुष्याच्या तुफान चर्चा रंगल्या आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील कोणत्याच प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा ऐश्वर्या आणि लेक आराध्या बच्चन यांना बच्चन कुटुंबियांपासून वेगळं स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे बच्चन कुटुंबात वाद सुरु आहेत.. अशा चर्चांनी जोर धरला. दरम्यान, ऐश्वर्या राय सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी पालन करत असलेल्या जुन्या परंपरेची देखील चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्याच्या बोटात एक अंगठी कायम दिसते. ऐश्वर्या राय कायम ‘व्ही’ आकाराची अंगठी घालते. ज्यामागे एक परंपरा आहे. ऐश्वर्या घालत असलेल्या अंगठीला वडुंगिला किंवा वेंकी असं देखील म्हणतात. ही एक पारंपारिक अंगठी आहे आणि कर्नाटकातील विवाहित स्त्रिया, विशेषतः तुळूमध्ये घातला जाणारा हा पारंपरिक दागिना आहे.

View this post on Instagram

A post shared by Zoom TV (@zoomtv)

सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश… याचं प्रतीक ‘व्ही’ आकारची अंगठी असते… असं मानलं जातं. तुलुनाडूमध्ये स्त्रिया लग्नानंतर ही अंगठी कायम घालतात. मात्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्येही याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते… असं देखील सांगितलं जातं.

ऐश्वर्या राय ही बंट समाजातील आहे. जो मातृसत्ताक प्रणालीचं पालन करतो. शिवाय ‘व्ही’ आकाराची अंगठी विवाहीत महिलांचं वाईट गोष्टींपासून रक्षण करते… अशी देखील मान्यता आहे… यावर पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

एक नेटकरी म्हणाला, ‘ही अंगठी दोघांच्या नात्याला वाचवू शकते…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सर्व वाईट गोष्टींपासून त्याचं रक्षण होवो…’ सध्या चाहत्यांमध्ये ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा