AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते माहितीये? अजिबात खंड पडत नाही, अन् तेच आहे तिचं ब्यूटी सिक्रेट

ऐश्वर्या राय बच्चन रोज किती वाजता उठते? आणि कशापद्धतीने तिची दिनचर्या सुरु होते. याबद्दल सांगितलं आहे. पण यातच तिच्या सौंदर्याचे एक महत्त्वाचे रहस्य दडलं आहे. ऐश्वर्या रायने खऱ्या अर्थाने तिच्या सौंदर्याचं सिक्रेट सांगितलं आहे.

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते माहितीये? अजिबात खंड पडत नाही, अन् तेच आहे तिचं ब्यूटी सिक्रेट
Aishwarya Rai Beauty Secret, she is Waking Up at 5:30 AM Image Credit source: instagram
| Updated on: Apr 16, 2025 | 4:21 PM
Share

बॉलिवूडची ‘गॉर्जियस क्वीन’ ऐश्वर्या राय बच्चन केवळ तिच्या अभिनय कौशल्याने आणि सौंदर्यानेच नव्हे तर तिच्या स्टायलिश लूकनेही लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. ही ब्यूटी क्वीन तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या साधेपणासाठीही जगभर ओळखली जाते. मध्यंतरी ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधान आलं होतं. मात्र या दोघांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिला नाही. दरम्यान जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये त्यांच्या एकत्र दिसण्याने या अफवांना आळा बसला.

ऐश्वर्या राय तिच्या शिस्तप्रिय सवयीसाठीही ओळखली जाते.

ऐश्वर्या राय तिच्या शिस्तप्रिय सवयीसाठीही ओळखली जाते. तिला सर्व कामे परफेक्ट करायला आवडतात. तसेच तिच्या सौंदर्याचे अजून एक रहस्य म्हणजे तिची अजून एक अतिशय साधी पण प्रभावी सवय आहे. ऐश्वर्या राय तिच्या दैनंदिन दिनचर्येमुळे एक आदर्श मानली जाते. एका मुलाखतीत, तिने तिच्या दैनंदिन दिनचर्या आणि तिच्या यशाचे रहस्य सांगितले होते.

ऐश्वर्या रोज किती वाजता उठते?

एका मुलाखतीत ऐश्वर्या रायने सांगितले की तिचा दिवस खूप लवकर सुरू होतो. ऐश्वर्या दररोज पहाटे 5.30 वाजता उठते आणि ती वर्षानुवर्षे ही दिनचर्या पाळत आहे. शूटिंग असो, कार्यक्रम असो किंवा मुलाखती असो, ती सर्वकाही पूर्ण परिपूर्णतेने करते आणि या शिस्तबद्ध जीवनशैलीचा सर्वात मोठा भाग म्हणजे सकाळी लवकर उठणे. “माझा दिवस नेहमीच पहाटे ५:३० वाजता सुरू होतो आणि ती एक ठरलेली सवय आहे,. माझा दिवस हा 24 तासांचा नसतो तर 48 तासांचे काम 24 तासांत पूर्ण करावे लागते”

“माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी आहेत की…..”

पुढे ती म्हणाली की, “माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी आहेत की मी त्या सर्व एकाच पॅटर्नमध्ये बसवू शकत नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे: माझा दिवस खूप लवकर सुरू होतो त्यामुळे मी ती सर्व कामे करण्यासाठी वेळ काढू शकते.” तिच्या मते “आम्ही महिला अनेक भूमिका बजावतो आणि कामाचे तास काय आहेत याचा आम्ही विचार करत नाही. आणि फक्त सर्वकाही योग्यरित्या आणि वेळेवर झाले आहे याची खात्री करतो.” असं म्हणत ती तिचा दिवस एवढ्या लवकर का आणि कसा सुरु करते याबद्दल सांगितलं आहे.

ऐश्वर्याच्या सौंदर्याचा खरा मंत्र 

दरम्यान ऐश्वर्याचा असा विश्वास आहे की सकारात्मक दृष्टिकोन असणे हाच खरा मंत्र आहे. ती म्हणते की, प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगला पाहिजे. वर्तमानात जगणे आणि प्रत्येक क्षण पूर्णपणे अनुभवणे अत्यंत महत्वाचे आहे. ही वृत्ती तिला आतून सुंदर बनवते, ज्याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे ऐश्वर्याच्या सौंदऱ्यांच्या रहस्यांमध्ये एक रहस्य म्हणजे पहाटे लवकर उठणे जेकी आपल्या घरातले मोठेही नेहमी सांगत असतात.

ऐश्वर्याच्या या मंत्राचा फायदा…

सकाळी लवकर उठल्याने शरीराची सर्केडियन लय (झोपेचे आणि जागे होण्याचे नैसर्गिक चक्र) संतुलित राहतात, ज्यामुळे चांगली झोप येते आणि त्वचा देखील निरोगी राहते. याव्यतिरिक्त, शरीराला स्वतःशी जोडण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी पहाटे पुरेसा वेळ मिळतो. यामुळे त्वचा चमकदार होते, केसांची गुणवत्ता सुधारते आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.