AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: ‘मी ऐश्वर्याच्या आयुष्यात राहावं…’, सलमान खानचं मोठं वक्तव्य

Salman Khan - Aishwarya Rai: सलमान खान - ऐश्वर्या राय यांच्या नात्याला कोणाचा होता विरोध? मुलाखतीत भाईजान म्हणाला, 'मी ऐश्वर्याच्या आयुष्यात राहावं...', सलमान - ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा कायम असते रंगलेली...

Salman Khan: 'मी ऐश्वर्याच्या आयुष्यात राहावं...', सलमान खानचं मोठं वक्तव्य
| Updated on: Jul 05, 2024 | 10:41 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती नाही असं कोणीही नाही. आज दोघे देखील त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. असं असतानाही त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. एक काळ असा होता जेव्हा फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील दोघांच्या नात्याची चर्चा होती. रिपोर्टनुसार, सलमान खान याच्यासठी ऐश्वर्या हिने आई-वडिलांचं घर देखील सोडलं होतं. दोघांच्या नात्यातील हे सत्य फार कमी लोकांना माहिती आहे.

रिपोर्टनुसार, सलमान खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ऐश्वर्या हिने आई-वडिलांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. आई – वडिलांचं घर सोडल्यानंतर ऐश्वर्या हिने लोखंडवाला येथील गोरख हिल टॉव्हरमध्ये अपार्टमेंट घेवून राहाण्याचा निर्णय घेतला. त्याच अपार्टमेंटमध्ये ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यातील वाईट काळ सुरु झाला. ब्रेकअपनंतर संतापलेला सलमान खान मध्यरात्री ऐश्वर्याच्या घरी पोहोचला. पण अभिनेत्री दरवाजा उघडला नाही. रात्री 3 वाजेपर्यंत दोघांमध्ये भांडणं सुरु होती.

मोठ-मोठ्याने होत असलेली भांडणं पाहिल्यानंतर शेजारच्यांनी पोलिसांना बोलावलं. अखेर ऐश्वर्या हिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 2002 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत, ती घटना घडली होती.. असं अभिनेता म्हणाला होता.

मुलाखतीत सलमान खान म्हणाला होता की, ‘ऐश्वर्या आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो. प्रत्येक नात्यात भांडणं होतात. प्रेम होतं म्हणून भांडणं झाली. नात्यात प्रेम नसतं तर भांडणं झालीच नसती…’ यावेळी सलमान खान याने ऐश्वर्या हिच्या कुटुंबियांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘ऐश्वर्याचे कुटुंबिय फार चांगलं आहेत. माझ्या कुटुंबियांप्रमाणे तिचे कुटुंबिय देखील रुढीवादी आहेत…’

‘माझ्या भूतकाळाबद्दल ऐश्वर्याच्या कुटुंबियांना माहिती झालं होतं. म्हणून मी ऐश्वर्याच्या आयुष्यात राहावं… अशी त्यांची इच्छा नव्हती. माझी चुकी आहे. मला समजून जायला हवं होतं. मी त्यांच्या मुलीसोबत वाईट वागलो. तरी देखील त्यांनी त्यांच्या मुलीला मला भेटू दिलं…’ असं देखील सलमान खान मुलाखतीत म्हणाला.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, 20 एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने 16 नोव्हेंबर 2011 मध्ये आराध्या हिला जन्म दिला. आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सच्या यादीत आराध्या अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.