AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्ट जाणार पाकिस्तानमध्ये? चाहत्याच्या प्रश्नाचे काय दिले उत्तर वाचा

Alia Bhatt: आलिया भट्टने रेड सी इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. दरम्यान, चाहत्यांसोबतच्या गप्पा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पाकिस्तानी चाहत्याने आलियाला जो प्रश्न विचारला त्याने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आलिया भट्ट जाणार पाकिस्तानमध्ये? चाहत्याच्या प्रश्नाचे काय दिले उत्तर वाचा
Alia bhattImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 11, 2025 | 1:03 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने दुसऱ्यांदा रेड सी इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला. यावेळी तिने वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मन मोकळे केले. तिने सांगितले की आता तिची मुलगी राहा इतकी मोठी झाली आहे की आईला प्रश्न विचारू लागली आहे. आलिया म्हणाली की राहा आता पापाराझींना ओळखते आणि त्यांच्याबाबत अनेक प्रश्न देखील विचारते. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले.

फेस्टिव्हलच्या एका सत्रात आलिया भट्टने चाहत्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. आलिया म्हणाली की आज तिची सर्वात मोठी ताकद वास्तविकता आणि प्रामाणिकपणा आहे. अभिनेत्री म्हणाली, प्रेक्षक नेहमी खऱ्या गोष्टीशी जोडले जातात, त्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असल्या तरीही.

‘तुम्ही कधी पाकिस्तानात येणार?’

यादरम्यान एका पाकिस्तानी चाहत्याने आलियाला विचारले, ‘तुम्ही कधी पाकिस्तानात येणार?’ तर आलियाने अतिशय संयमित पद्धतीने उत्तर दिले, ‘मी तिथे जाईन जिथे माझे काम मला घेऊन जाईल.’ हे छोटेसे उत्तर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. पाकिस्तानी युजर्सनी ते पाहून आलियाचे कौतुक केले आहे. एकाने, ‘आलियाने किती सुंदररीत्या हँडल केले, लव्ह यू!’ अशी कमेंट केली आहे.

मुलगी राहा आता प्रश्न विचारू लागली आहे

आलियाने मुलगी राहाचा उल्लेख करताना सांगितले की, ‘आता राहाचे पापाराझींसोबत वेगळे नाते तयार झाले आहे. ती आता इतकी मोठी झाली आहे की मला विचारते की मी कुठे जात आहे आणि कधी परतणार.’ तिने सांगितले की आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि आता तिच्या आयुष्यात ऑथेंटिसिटीला सर्वात जास्त महत्त्व आहे.

सुरुवातीच्या काळाची आठवण करून देत आलिया म्हणाल्या, ‘त्यावेळी मी सर्वत्र धावत होते, सर्व काही करण्याचा प्रयत्न करत होते. १७-१८ वर्षांच्या आलियाला खूप उत्साह होता, पूर्णपणे बिंदास. आता मी उत्साहाने भरलेली आहे, पण थोडी शांत झाली आहे. आता प्रत्येक पावलात इंटेंट असते. यश आणि अपयश दोन्ही माणसाला थोडे सावध बनवतात. तरीही मी त्या १८ वर्षांच्या मुलीला जिवंत ठेवू इच्छिते जी निर्भय होती, जिला काही माहित नव्हते की पुढे काय होणार.’

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.