ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, बिग बीचं ट्विट व्हायरल, एका शब्दामुळे सर्वत्र खळबळ

Aishwarya Rai and Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचा होणार घटस्फोट, अमिताभ बच्चन यांनी नुकताच केलेलं ट्विट सर्वत्र चर्चेत, बिग बींच्या एका शब्दामुळे सर्वत्र खळबळ, बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, बिग बीचं ट्विट व्हायरल, एका शब्दामुळे सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 1:07 PM

Aishwarya Rai and Abhishek Bachchan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. एकेकाळी चाहत्यांना फॅशन गोल्स देणारं कपल आता घटस्फोट घेणार आहेत… अशी चर्चा रंगली आहे. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

अमिताभ बच्चन यांचं ट्विट व्हायरल

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर ब्लॉगच्या माध्यमातून मौन सोडलं होतं. ‘तर्क फक्त तर्क असतात… त्यामध्ये काहीही तथ्य नसतं…’ असं बिग बी म्हणाले होते. आता देखील बिग बी यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

2 डिसेंबर 2024 रोजी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं आहे. ‘चूप’ हाच एक शब्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट केला आहे. शिवाय पुढे राग येणारा इमोजी देखील पोस्ट केला आहे. ऐश्वर्या राय हिने नावापुढील बच्चन आडनाव हटवल्यानंतर बिग बी यांनी ट्विट केलं आहे.

ऐश्वर्याने बच्चन नाव हटवलं?

नुकताच एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या उपस्थित होती. तेव्हा अभिनेत्रीने बच्चन ऐवजी फक्त ‘ऐश्वर्या राय’ अशा नावाने स्वतःला संबोधित केलं. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं. शिवाय सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामुळे अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत असतं.

ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.