AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अभिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा सोडलं मौन

Aishwarya Rai - Abhishek Bachchan: कुटुंबाबद्दल अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य, ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान बिग बींनी सोडलं मौन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्याची चर्चा...

ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अभिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा सोडलं मौन
| Updated on: Nov 22, 2024 | 9:13 AM
Share

Aishwarya Rai – Abhishek Bachchan: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसत असल्यामुळे देखील दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी माझ्या कुटुंबाबद्दल फार काही बोलत नाही आणि मला आवडत देखील नाही… असं वक्तव्य अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

नुकताच अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून नक्की सत्य काय आहे सांगितलं आहे. बिग बी म्हणाले, ‘वेगळं वागण्यासाठी आणि जीवनात वेगळेपणाच्या सत्यांवर विश्वास ठेवण्यासाठी धैर्य आणि प्रामाणिकपणा लागतो… कुटुंबाबद्दल मी फार काही बोलत नाही. कारण ते माझं क्षेत्र आहे आणि त्याची गोपनीयता राखणं माझं कर्तव्य आहे… तर्क केवळ तर्कच असतात…’ असं देखील बिग बी म्हणाले.

‘तर्क हे कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता फक्त अंदाज बांधून केलेले तर्क असतात… अफवा फक्त खोट्या असतात. त्यामध्ये काहीच तथ्य नसतं… त्याची पडताळणी व्हायला हवी… त्यांच्या आवडीचा व्यवसाय करण्याच्या त्यांच्या निर्णयावर मी शंका घेऊ नये. त्यांच्या समाजातील योगदानाचं मी कौतुक केलं पाहिजे… पण खोटं आणि प्रश्नचिन्ह त्यांची कायद्याच्या कचाटयातून रक्षा करु शकेल… पण प्रश्नचिन्ह उपस्थित करून संशयाचे बीज पेरले गेलं आहे.

पुढे बिग बी म्हणाले, ‘तुम्हाला जे आवडत आहे ते तुम्ही लिहिता… पण त्यापुढे प्रश्नचिन्हाचा वापर करता…, त्यामुळे तुम्ही केवळ अहवाल शंकास्पद आहे हेच दाखवत नाही, तर वाचकांनीही त्यावर विश्वास ठेवावा अशी तुमची इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होत राहील.’

असत्य किंवा असत्यावर प्रश्न उपस्थित करून तुम्ही तुमचं काम करता. पण त्याचा एखाद्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर कसा परिणाम होऊ शकतो…’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले. सध्या अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा