AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arijit Singh: आता ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यावरून वाद; अरिजीत सिंगचा कॉन्सर्ट रद्द केल्यावरून राजकारण

ममता बॅनर्जी यांच्यासमोर अरिजीतने गायलं होतं 'रंग दे तू मोहे गेरुआ'; आता कॉन्सर्ट रद्द, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

Arijit Singh: आता 'रंग दे तू मोहे गेरुआ' गाण्यावरून वाद; अरिजीत सिंगचा कॉन्सर्ट रद्द केल्यावरून राजकारण
'रंग दे तू मोहे गेरूआ' गाण्यावर वादImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2022 | 8:26 AM
Share

कोलकाता: प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजीत सिंगच्या लाईव्ह शोवरून नवा वाद निर्माण झाला आहे. अरिजीतचा कॉन्सर्ट कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कॉन्सर्ट आता रद्द करण्यात आला आहे. ईको पार्कमध्ये होणारा हा कॉन्सर्ट राजकीय कारणांमुळे रद्द झाल्याचं म्हटलं जातंय. कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘रंग दे तू मोहे गेरूआ’ हे गाणं गायल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचं कळतंय. कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अरिजीतकडे ‘गेरूआ’ गाणं गाण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर अरिजीतने हे गाणं गायलंसुद्धा होतं. मात्र आता त्याचाच फटका बसल्याचं म्हटलं जातंय.

भाजप-टीएमसीमध्ये वाद

अरिजीत सिंगच्या कॉन्सर्टवरून आता भाजप आणि टीएमसी या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल युवा भाजप नेते इंद्रनील खान यांनी अरिजीतच्या शोवरून टीएमसी सरकारवर टीका केली. ‘इको पार्कमध्ये होणारा अरिजीत सिंगचा शो पश्चिम बंगाल सरकारच्या HIDCO संस्थेद्वारे का रद्द केला गेला? KIFF मध्ये त्याने रंग तू मोहे गेरूआ हे गाणं गायल्याचे हे परिणाम आहेत का’, असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे केला. इतकंच नव्हे तर त्यांनी टीएमसीवर असहिष्णुतेचाही आरोप केला आहे.

याशिवाय भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीसुद्धा अरिजीतच्या कॉन्सर्टबद्दल एक ट्विट केलंय. ‘KIFF मध्ये अरिजीतने रंग दे तू मोहे गेरुआ हे गाणं गायल्यामुळे त्याचं कॉन्सर्ट रद्द केलं गेलं’, असं त्यांनी लिहिलंय.

टीएमसीने दिलं उत्तर

या वादावर आणि भाजपकडून झालेल्या आरोपांवर टीएमसीकडूनही उत्तर देण्यात आलं. HIDCO चे अध्यक्ष फिरहाद हकीम यांनी भाजप नेत्यांच्या आरोपांना फेटाळले आहेत. ‘कॉन्सर्टच्या आयोजकांनी स्थानिक पोलिसांना याविषयी अधिकृतपणे माहिती दिली नव्हती. त्यांना फक्त तोंडी सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे जी-20 संमेलनसुद्धा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कॉन्सर्टची जागा बदलण्यास सांगितलं आहे. यामागे कोणतंच राजकारण नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

अरिजीतचा हा कॉन्सर्ट फेब्रुवारीमध्ये होणार होता. या संपूर्ण प्रकरणी अद्याप अरिजीतकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा