AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 मिनिटं 49 सेकंदाचं ‘ते’ भन्नाट गाणं, ज्यामुळे हेलन झाल्या स्टार, पण गाणं गायल्या घाबरत होत्या आशा ताई

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्यावर 13 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि एका पर्वाचा अतं झाला. वयाच्या 92 व्या वर्षी आशा ताईंनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांचं निधन फक्त त्यांच्या कुटुंबियांसाठीच नाही तर, संपूर्ण देशासाठी फार मोठा धक्का आहे. आशा ताई यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि संगीत विश्वात कधीच न भरुन निघणारी पोकळी निर्माण […]

5 मिनिटं 49 सेकंदाचं 'ते' भन्नाट गाणं, ज्यामुळे हेलन झाल्या स्टार, पण गाणं गायल्या घाबरत होत्या आशा ताई
Helen
| Updated on: Apr 14, 2026 | 12:55 PM
Share

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्यावर 13 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि एका पर्वाचा अतं झाला. वयाच्या 92 व्या वर्षी आशा ताईंनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांचं निधन फक्त त्यांच्या कुटुंबियांसाठीच नाही तर, संपूर्ण देशासाठी फार मोठा धक्का आहे. आशा ताई यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि संगीत विश्वात कधीच न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशा ताईंनी जवळपास 7 दशक संगीताची सेवा केली आणि असंख्या गाण्यांना एक वेगळं रुप दिलं… आशा ताईंमुळे असंख्य गाणी सदाबहार झाली. असंच एक गाणं जे हीट तर झालं, पण ते गाणं गाण्यासाठी आशा ताई थोड्याफार घाबरलेल्या आणि त्याच गाण्यामुळे दिग्गज अभिनेत्री आणि डान्सर हेलन एका रात्रीत स्टार झाल्या…

सांगायचं झालं तर, सध्या ज्या गाण्याची चर्चा रंगली आहे. ते गाणं 55 वर्ष जुनं गाणं आहे. 1971 मध्ये प्रदर्शित झालेलं हं गाणं त्याकाळचं कल्ट सॉन्ग म्हणून हीट ठरलं. एवढंच नाही तर, गाण्यात हेलन यांना कास्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर हेलन यांचं नशीब पूर्णपणे बदललं. हे गाणं दुसरं तिसरं कोणतं नाही तर, ‘पिया तू अब तो आजा’ हे आहे.

‘कारवां’ सिनेमातील गाणं

आशा भोसले यांचं हे सदाबहार कल्ट सॉन्ग ‘पिया अब तो आजा’ हे ‘कारवां’ सिनेमातील आहे. हे गाणं आजही चाहत्यांमध्ये प्रचंड हीट आहे. गाण्याचं म्यूझीक आरजडी बर्मन यांनी तयार केलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आशा भोसले ‘हे’ गाणं गाण्यासाठी तयार नव्हत्या. रिपोर्टनुसार, आशा भोसले कायम एका गोष्टीमुळे नाराज असायच्या आणि ती म्हणजे लता मंगेशकर यांना चांगली गाणी गाण्याची संधी मिळते आणि त्याना बोल्ड गाणी गाण्यासाठी विचारलं जातं.

याबद्दल आशा भोसले यांनी मोठी बहीण लता दीदी यांच्यासोबत देखील चर्चा केलेली. पण तेव्हा आर.डी. बर्मन यांनी सांगितलं होतं की, गाणं सुपर हीट होईल आणि ‘पिया तू अब तो आजा’ हे गाणं इतकं हीट झालं की, आजही चाहते या गाण्यावर थिरकतात… 55 वर्षांनंतर देकील गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.

आशा भोसले यांनी 20 भाषांमध्ये जवळपास 12 हजारपेक्षा अधिक गाण्यांना स्वतःचा आवज दिला. सर्वात जास्त रेकॉर्डिंग केल्याने त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आहे… त्यांना सूरांची मल्लीका म्हटलं जात होतं.

Follow Us
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.
अकोला महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच राडा; शिंदेसेना-भाजप आमनेसामने
अकोला महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच राडा; शिंदेसेना-भाजप आमनेसामने.
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.