AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 मिनिटं 49 सेकंदाचं ‘ते’ भन्नाट गाणं, ज्यामुळे हेलन झाल्या स्टार, पण गाणं गायल्या घाबरत होत्या आशा ताई

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्यावर 13 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि एका पर्वाचा अतं झाला. वयाच्या 92 व्या वर्षी आशा ताईंनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांचं निधन फक्त त्यांच्या कुटुंबियांसाठीच नाही तर, संपूर्ण देशासाठी फार मोठा धक्का आहे. आशा ताई यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि संगीत विश्वात कधीच न भरुन निघणारी पोकळी निर्माण […]

5 मिनिटं 49 सेकंदाचं 'ते' भन्नाट गाणं, ज्यामुळे हेलन झाल्या स्टार, पण गाणं गायल्या घाबरत होत्या आशा ताई
Helen
| Updated on: Apr 14, 2026 | 12:55 PM
Share

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्यावर 13 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि एका पर्वाचा अतं झाला. वयाच्या 92 व्या वर्षी आशा ताईंनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांचं निधन फक्त त्यांच्या कुटुंबियांसाठीच नाही तर, संपूर्ण देशासाठी फार मोठा धक्का आहे. आशा ताई यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि संगीत विश्वात कधीच न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशा ताईंनी जवळपास 7 दशक संगीताची सेवा केली आणि असंख्या गाण्यांना एक वेगळं रुप दिलं… आशा ताईंमुळे असंख्य गाणी सदाबहार झाली. असंच एक गाणं जे हीट तर झालं, पण ते गाणं गाण्यासाठी आशा ताई थोड्याफार घाबरलेल्या आणि त्याच गाण्यामुळे दिग्गज अभिनेत्री आणि डान्सर हेलन एका रात्रीत स्टार झाल्या…

सांगायचं झालं तर, सध्या ज्या गाण्याची चर्चा रंगली आहे. ते गाणं 55 वर्ष जुनं गाणं आहे. 1971 मध्ये प्रदर्शित झालेलं हं गाणं त्याकाळचं कल्ट सॉन्ग म्हणून हीट ठरलं. एवढंच नाही तर, गाण्यात हेलन यांना कास्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर हेलन यांचं नशीब पूर्णपणे बदललं. हे गाणं दुसरं तिसरं कोणतं नाही तर, ‘पिया तू अब तो आजा’ हे आहे.

‘कारवां’ सिनेमातील गाणं

आशा भोसले यांचं हे सदाबहार कल्ट सॉन्ग ‘पिया अब तो आजा’ हे ‘कारवां’ सिनेमातील आहे. हे गाणं आजही चाहत्यांमध्ये प्रचंड हीट आहे. गाण्याचं म्यूझीक आरजडी बर्मन यांनी तयार केलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आशा भोसले ‘हे’ गाणं गाण्यासाठी तयार नव्हत्या. रिपोर्टनुसार, आशा भोसले कायम एका गोष्टीमुळे नाराज असायच्या आणि ती म्हणजे लता मंगेशकर यांना चांगली गाणी गाण्याची संधी मिळते आणि त्याना बोल्ड गाणी गाण्यासाठी विचारलं जातं.

याबद्दल आशा भोसले यांनी मोठी बहीण लता दीदी यांच्यासोबत देखील चर्चा केलेली. पण तेव्हा आर.डी. बर्मन यांनी सांगितलं होतं की, गाणं सुपर हीट होईल आणि ‘पिया तू अब तो आजा’ हे गाणं इतकं हीट झालं की, आजही चाहते या गाण्यावर थिरकतात… 55 वर्षांनंतर देकील गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.

आशा भोसले यांनी 20 भाषांमध्ये जवळपास 12 हजारपेक्षा अधिक गाण्यांना स्वतःचा आवज दिला. सर्वात जास्त रेकॉर्डिंग केल्याने त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आहे… त्यांना सूरांची मल्लीका म्हटलं जात होतं.

Follow Us
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल