AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेव्हा आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, पण…’, अभिषेक बच्चन याने सांगितला ‘तो’ किस्सा

Abhishek Bachchan : 20 वर्षांपूर्वी कशी होती बच्चन कुटुंबाची परिस्थिती, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी देखील नव्हते पैसे? अभिषेक बच्चन याने सांगितला 'तो' किस्सा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याची चर्चा...

'तेव्हा आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, पण...', अभिषेक बच्चन याने सांगितला 'तो' किस्सा
| Updated on: Dec 27, 2023 | 1:46 PM
Share

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन याने नुकताच झालेल्या मुलाखतीत आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी अभिषेक याला एका पुरस्कार सोहळ्यात पाहिले आणि अभिनेत्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. पण त्याआधी अभिषेक तब्बल 2 वर्ष याच प्रतीक्षेत होता, की त्याला कोणी सिनेमात कास्ट करेल. एवढंच नाहीतर, अभिषेक याने वडील अमिताभ बच्चन यांच्या संघर्षाबद्दलही सांगितलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगील आहे.

अभिषेक म्हणाला, ‘मला कायम प्रसिद्ध अभिनेता व्हायचं होतं. म्हणून मी अनेक दिग्दर्शकांकडे देखील गेलो. पण अमिताभ बच्चन यांचा मुलगा आसल्यामुळे मला कोणताच दिग्दर्शक कास्ट करण्यासाठी तयार नव्हता. अखेर मी आणि माझ्या मित्राने मिळून स्क्रिप्ट लिहिण्याची सुरुवात केली. पण ती स्क्रिप्ट देखील पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर एकदा वडिलांसोबत फिल्मफेअर अवॉर्डसाठी गेलो आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.’

’20 वर्षापूर्वी फिल्मफेअर अवॉर्डसाठी कोणते कपडे घालायचे हे एक महिन्याआधी ठरलेलं असायचं. तेव्हा कोणी रेंट किंवा मेफत कपडे देत नव्हतं. म्हणून कपडे विकतच घ्यावे लागायचे. फिल्मफेअर अवॉर्डच्या संध्याकाळी कोणीच शुटिंग करायचं नाही. पूर्ण इंडस्ट्री फिल्मफेअर अवॉर्डसाठी उपस्थित असायची..’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘एकदा वडील मला म्हणाले, फिल्मफेअर अवॉर्डसाठी तू सुद्धा माझ्यासोबत चल… पण तेव्हा इतके पैसे नव्हते, की नवीन कपडे खरेदी करता येतील… आता मी जे काही बोलत आहे, त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण तेव्हा महागडे कपडे खरेदी करणं आम्हाला परवडणारं नव्हातं… तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. पण लोकांना आमची परिस्थिती दिसू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो.’

‘ फिल्मफेअर अवॉर्डसाठी काय घालू. माझ्याकडे फॉर्मल नव्हते. टी-शर्ट मला आवडत नव्हते. म्हणून फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मी बहिणीच्या लग्नातील शेरवानी घातली होती…पण त्याच फिल्मफेअर अवॉर्डनंतर माझा अभिनयाचा प्रवास सुरु झाला…’

अभिषेक बच्चन याला कसा मिळाला पहिला सिनेमा…

तेव्हा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये दिग्दर्शत जेपी दत्ता यांना ‘बॉर्डर’ सिनेमासाठी पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. अभिषेक म्हणाला, ‘पुरस्कार घेऊन येत असताना जेपी दत्ता यांनी मला पाहिलं आणि दोन दिवसांनंतर मला भेटण्यासाठी बोलावलं आणि मला सिनेमा ऑफर केला…’

अभिषेक याने 2000 मध्ये जेपी दत्ता यांच्या ‘रिफ्युजी’ सिनेमापटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री करीना कपूर हिने देखील ‘रिफ्युजी’ सिनेमापटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला, पण अभिषेक आणि करीना यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

Follow Us
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.