AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | सोबत खेळले, चर्चेतही राहिले, आता असं काय घडलं ज्यामुळे बिग बॉसची ‘मंडली’ तुटली?

बिग बॉसच्या घरात एकमेकांसोबत नातं टिकवणं हे स्पर्धकांसमोर सर्वांत कठीण आव्हान असतं. प्रत्येक सिझननुसार नव्या नाती प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सोळाव्या सिझनमध्ये काही स्पर्धकांनी मिळून मंडली बनवली.

Bigg Boss 16 | सोबत खेळले, चर्चेतही राहिले, आता असं काय घडलं ज्यामुळे बिग बॉसची 'मंडली' तुटली?
Bigg Boss 16 MandaliImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 07, 2025 | 3:38 PM
Share

मुंबई : बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जेव्हा ट्रॉफीसाठी एकमेकांविरोधात उभे असतात, तेव्हा मैत्री कितीही घट्ट असली तरी त्यात वितुष्ट येताना अनेकदा पाहिलं गेलंय. बिग बॉसच्या घरात नाती टिकवणं हे स्पर्धकांसमोरील मोठं आव्हान असतं. मात्र प्रत्येक सिझननुसार नवीन नातीसुद्धा बनतात. बिग बॉसचा सोळावा सिझन चांगलाच गाजला. एकीकडे सर्वांशी पंगा घेऊन प्रियांका चहर चौधरीने स्वतंत्र खेळाकडे लक्ष केंद्रित केलं. तर दुसरीकडे मैत्रीच्या नावाखातर काही स्पर्धकांनी मिळून मंडली बनवली. याच मंडलीच्या माध्यमातून हे स्पर्धक खेळात पुढे सरकले. मात्र या मंडलीमधील स्पर्धकांची मैत्री पाहून चाहते फार खुश झाले होते.

बिग बॉसची ट्रॉफीसुद्धा मंडलीचा सदस्य एमसी स्टॅनने जिंकली. संपूर्ण मंडलीला एमसी स्टॅनच्या विजयापेक्षा प्रियांका चहर चौधरीच्या पराजयाने जास्त आनंद झाला होता. बिग बॉसचा शो संपल्यानंतरही मंडलीतील सदस्य एकत्र दिसले. कधी पार्ट्यांमध्ये तर कधी इव्हेंट्समध्ये मंडलीतील सदस्यांना सोबत पाहिलं गेलं. साजिद खानने बनवलेली ही मंडली बराच वेळ चर्चेत राहिली. मात्र आता ही मंडली तुटल्याचं पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंडलीतील सदस्य एकत्र दिसत नव्हते. या मंडलीत साजिद खान, अब्दु रोझिक, निमृत कौर आहलुवालिया, एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुंबुल तौकिर खान यांचा समावेश होता. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात निमृतला मंडलीबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर ती कंटाळून म्हणाली, “नेहमीच काय मंडलीबद्दल प्रश्न विचारता?” याशिवाय आणखी एका व्हिडीओमध्ये अब्दु रोझिक म्हणताना दिसतोय की, “मंडली खत्म”.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये अब्दुला एमसी स्टॅनबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर अब्दु म्हणतो “दोस्ती खत्म”. अब्दु आणि एमसी स्टॅन यांच्यात काहीतरी वाद झाल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शिव आणि निमृत एकत्र म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार होते. मात्र त्यांच्या या व्हिडीओचंही काम अद्याप सुरू झालं नाही. त्यामुळे फक्त बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी मंडलीतील स्पर्धकांनी एकमेकांशी मैत्री केली होती का, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.