AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19: वीकेंड का वारमध्ये कोण झालं बेघर? वर्डिक्ट रुममध्ये मोठा ट्विस्ट

'बिग बॉस 19'चा पहिला 'वीकेंड का वार'चा एपिसोड नुकताच पार पडला. या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने स्पर्धकांसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर तान्या मित्तल आणि अशनूर कौर यांना वर्डिक्ट रुममध्ये एकमेकींसमोर आणलं गेलं. त्यानंतर घरातील इतर सदस्यांना वोट करण्यास सांगितलं गेलं.

Bigg Boss 19: वीकेंड का वारमध्ये कोण झालं बेघर? वर्डिक्ट रुममध्ये मोठा ट्विस्ट
Gaurav Khanna with Ashnoor Kaur and Tanya MittalImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 01, 2025 | 12:15 PM
Share

‘बिग बॉस 19’ या शोचा सर्वांत रंजक भाग म्हणजे ‘वीकेंड का वार’. या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खान त्याच्या खास अंदाजात स्पर्धकांशी गप्पा मारतो, काहींची शाळा घेतो तर काहींसोबत थट्टा-मस्करी करतो. या एपिसोडदम्यान घरातून एका स्पर्धकाला कायमचं घराबाहेर जावं लागतं. नेहमीप्रमाणेच यंदाच्या सिझनचाही पहिला ‘वीकेंड का वार’ एपिसोड धमाकेदार होता. सलमानने घरातील सदस्यांना दुसऱ्या आठवड्यापासूनच अॅक्टिव्ह मोडवर येण्याचा सल्ला दिला आहे. तर कॉमेडियन प्रणित मोरेची त्याने चांगलीच शाळा घेतली. तान्या मित्तल आणि सलमान यांच्यातील संवादसुद्धा मजेशीर होता.

कोण झालं बेघर?

‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमानने प्रत्येक स्पर्धकासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. घरातील सोळा सदस्यांपैकी त्याला एकाला एलिमिनेट करायचं होतं. पहिल्याच आठवड्यात गौरव खन्ना, तान्या मित्तल, अभिषेक बजाज, मृदुल तिवारी, प्रणित मोरे, झीशान कादरी, नतालिया आणि निलम यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व सदस्य एलिमिनेशन राऊंडमध्ये सुरक्षित राहिले. म्हणजेच या आठवड्यात कोणीच घराबाहेर गेलं नाही.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

तान्या vs अशनूर

बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडपासून तान्या मित्तल आणि अशनूर कौर या दोघींमध्ये शीतयुद्ध पहायला मिळतंय. वीकेंड का वार एपिसोडमध्ये तान्या आणि अशनूरला वर्डिक्ट रुममध्ये पाठवण्यात आलं होतं. या दोघींपैकी स्वत:ला कोण अधिक वरचढ समजतं, यावरून घरातील इतर सदस्यांना वोटिंग करण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर सलमानने तान्याला विनम्रपणे वागण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात भांडण झाल्यानंतर कुनिका सदानंदने तिची कॅप्टन्सी सोडली. घरातील दुसऱ्या कोणाला तरी कॅप्टन बनवण्याची विनंती तिने बिग बॉसकडे केली. ‘बिग बॉस 19’ हा शो जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 9 वाजता आणि कलर्स टीव्हीवर रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

कुनिका सदानंद आणि इतर सदस्यांमधील मतभेदांमुळे घरातील समीकरणे वेगाने बदलली. असभ्यतेचा आरोप झाल्यानंतर कुनिकाने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला. आधी बसीर आणि कुनिका यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यानंतर कुनिकाने फरहानाशीही भांडण केलं. यानंतर घरातील तणाव वाढला. कुनिकाच्या स्वभावामुळे घरातील संघर्ष वाढल्याचं मत अमाल मलिकने मांडलं होतं.

Follow Us
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...