AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Alert : गारपिटीचे पुन्हा संकट! 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, पुढील काही तास धोक्याचे…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांकरिता गारपिटीसह पावसाचा मोठा इशारा दिला. आजही राज्याती काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

IMD Weather Alert : गारपिटीचे पुन्हा संकट! 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, पुढील काही तास धोक्याचे...
Rain
| Updated on: Mar 17, 2026 | 7:20 AM
Share

राज्यातील हवामानात सातत्याने चढउतार बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पुढील 4 दिवसांकरिता मोठा इशारा दिला. राज्यात एकीकडे उष्णतेचा चटका वाढला आहे तर दुसरीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील जवळपास भागात पुढील चार दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे. यादरम्यानच अनेक भागात उष्णता वाढण्याचेही संकेत आहेत. मार्च महिन्याला सुरूवात झालेली असतानाही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सतत पाऊस सुरू आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावण्याचा अंदाज आहे. गारपिटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बीचे पिक काढले जात असतानाही पावसाने हजेरी लावली. कृषी विभागानेही पुढील 4 दिवसांपासून शेतकऱ्यांना मोठा इशारा दिला.

भारतीय हवामान विभागाने नांदेड, सोलापूर, लातूर, नागपूर, भंडारा, गोदिंया, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागाता पावसाचा येलो अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा आज अंदाज आहे. बाकी उर्वरित राज्यात उकाडा असेल. देशातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. अमरावतीमध्ये उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

यासोबतच 20 मार्चपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यादरम्यान काही भागात गारपिट होण्याचाही अंदाज आहे. कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. पंजाबच्या गुरूदासपूरमध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. गुरूदासपूरमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला.

थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात आता उन्हाचा चटका जाणवू लागला असून कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. निफाड येथे आज कमाल 38.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून नागरिक उष्णतेने हैराण झाले उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक रसवंतीगृह तसेच शीतपेयीच्या दुकानात मोठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसत बघायला मिळत आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.