Sushant Death Case | क्वारंटाईनमधून सुटका, पाटण्याचे एसपी विनय तिवारी बिहारला परतणार

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी आणि चार अधिकारी दोन ऑगस्टला रात्री मुंबईला आले होते

Sushant Death Case | क्वारंटाईनमधून सुटका, पाटण्याचे एसपी विनय तिवारी बिहारला परतणार
Follow us
| Updated on: Aug 07, 2020 | 8:21 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी बिहारला परत जाणार आहेत. मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन संपवण्याची मुभा दिली आहे. तिवारींना बळजबरीने होम क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. (Bihar IPS officer Vinay Tiwari who was quarantined in Mumbai to leave for Patna)

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी आणि चार अधिकारी दोन ऑगस्टला रात्री मुंबईला आले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनय तिवारी यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले.

“बीएमसीने एसएमएसद्वारे मला कळवले आहे की मी होम क्वारंटाईन सोडून जाऊ शकतो. मी आता पाटण्याला रवाना होणार आहे” असे विनय तिवारी यांनी ‘एएनआय’ला सांगितले.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे बिहार पोलिसांनी विनय तिवारी यांना परतण्याचे आदेश दिल्याची शक्यता आहे. तिवारींसह आलेले चार पोलीस अधिकारी कालच पाटण्याला परतले, तर तिवारी आज निघणार आहेत.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप झाला. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीटद्वारे केला.

“विनय तिवारी यांनी विनंती करुनही त्यांची आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्यात आली नाही. ते गोरेगावच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत” असेही पांडे यांनी फेसबुकवर सांगितले. विनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत होती.

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली ठरवण्यात आली आहे, त्यानुसार पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले होते.

(Bihar IPS officer Vinay Tiwari who was quarantined in Mumbai to leave for Patna)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.