AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीच्या पराभवावर कंगना राणौत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “दैत्यांचा..”

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, असं त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या पराभवावर कंगना राणौत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या दैत्यांचा..
BJP MP Kangana Ranaut Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2024 | 2:27 PM
Share

विधानसभा निवडणुकीत 288 पैकी तब्बल 235 जागा जिंकून महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. यात एकट्या भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनीही दमदार कामगिरी केली. या विजयानंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “”आमच्या पक्षासाठी हा एक ऐतिहासिक विजय आहे. साहजिकच आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत. या निकालासाठी आम्ही महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या जनतेचे आभार मानतो,” असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीकाही केली. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, अशी टीका कंगना यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंचा पराभव असा होईल याची अपेक्षा होती का?, असा प्रश्न कंगना यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “होय, मला ही अपेक्षा होती. कारण इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे आणि माझे बरेच रील्ससुद्धा व्हायरल होत आहेत की आपण दैत्य आणि देवता यांना कसं ओळखतो? जे महिलांचा अनादर करतात, ते त्याच श्रेणीतील असतात. ते दैत्यच असतात. जे महिलांचा आदर करतात, ते देवतासमान असतात. आज महिलांना 33 टक्के आरक्षण, टॉयलेट्स, धान्य, गॅस सिलेंडर देण्यात आले आहेत. त्यावरून समजतंय की कोण दैत्य आणि कोण देवता आहे? त्यामुळे दैत्यांचं तेच झालं, ते नेहमीपासून होत आलंय. त्यांचा पराभव झालाय.”

याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “महाभारतात एकच कुटुंब होतं, पण तरी त्यांच्यात किती फरक होता ते पहा. जे महिलांचा अपमान करतात, त्यांना अशीच वागणूक मिळते. माझं घर तोडलं गेलं, मला शिवीगाळ करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसून येतंच होतं. काँग्रेसलाही जनतेकडून मजबूत उत्तर मिळालं आहे. हा देश बऱ्याच बलिदानांनी बनला आहे. त्यामुळे काही मूर्ख लोक एकत्र आले तरी या देशाचे तुकडे होऊ शकत नाहीत आणि आम्ही होऊ देणारही नाही.” मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे पाहता, असा प्रश्न विचारला असता पक्षातील वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, असं उत्तर कंगना यांनी दिलं.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...