AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल शाहरुख खानकडून धक्कादायक खुलासा, ‘अचानक गाणं वाजू लागलं आणि…’

Shah Rukh Khan On Divya Bharti Death: 'अचानक गाणं वाजू लागलं आणि...', दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल शाहरुख खान याने केला धक्कादायक खुलासा...., आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं रहस्य गुसदस्त्यात..., आजही दिव्या भारती असते चाहत्यांमध्ये चर्चेत...

दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल शाहरुख खानकडून धक्कादायक खुलासा, 'अचानक गाणं वाजू लागलं आणि...'
| Updated on: Nov 08, 2024 | 11:56 AM
Share

Shah Rukh Khan On Divya Bharti Death: दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती हिच्या मृत्यूला अनेक वर्ष झाली आहेत. वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारती हिचं निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनाला 30 वर्ष झाली असली तरी देखील दिव्याचं निधन आजही एक रहस्य आहे. आजही दिव्या भारती हित्या मृत्यूबद्दल अनेक खुलासे समोर येतात. दिव्याच्या निधनाबद्दल अभिनेता शाहरुख खान याने देखील धक्कादायक खुलासा केला होता. शिवाय अभिनेत्रीच्या स्वभावाबद्दल देखील किंग खानने सांगितलं होतं.

एका जुन्या मुलाखतीत शाहरुख खान याने मोठं वक्तव्य केलं होतं. शाहरुख खान म्हणाला होता, ‘एका अभिनेत्रीच्या रुपात दिव्या भारती फार दमदार होती. मी गंभीर स्वभावाचा मुलगा होतो आणि दिव्या कायम आनंदी असायची. मला आठवत आहे. मी सी रॉक हॉटेलमध्ये डबिंग पूर्ण केली होती. ‘दिवाना’ सिनेमासाठी डबिंग केली होती.’

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

‘हॉटेलमधून बाहेर निघाल्यानंतर मला दिव्या दिसली. माझ्याकडे पाहिलं आणि दिव्या म्हणाली, ‘तू फक्त अभिनेता नाही तर, एक इंस्टीट्यूशन आहे. दिव्या असं का म्हणाली, तेव्हा मला कळलं नाही. पण जेव्हा कळलं तेव्हा समजलं त्या एका शब्दात फार काही दडलं होतं…’ असं शाहरुख खान म्हणाला.

दिव्याच्या मृत्यूबद्दल शाहरुखने केलेला खुलासा

शाहरुख म्हणाला, ‘मी तिच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. मी दिल्लीमध्ये होतो. झोपलो होतो आणि सकाळी अचानक ‘ऐसी दिवानगी’ गाणं वाजू लागलं. त्यानंतर कळलं दिव्याचं निधन झालं आहे. बाल्कनीतून दिव्या खाली पडली. तिच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मला धक्का बसल… मला तिच्यासोबत आणखी सिनेमांमध्ये काम करायचं होतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

दिव्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी वयात आणि कमी कालावधीत अभिनेत्रीने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दिव्याच्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘क्षत्रिय’ होतं. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचे ‘रंग’, ‘थोली मुधु’ आणि ‘शतरंज’ सिनेमे प्रदर्शित झाले. आजही दिव्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Follow Us
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....