AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रणौतकडून लग्नाबद्दल मोठा खुलासा, ‘सासू – सासरे पळून गेले इतकं बदनाम…’

Kangana Ranaut: 'सासू - सासरे पळून गेले इतकं बदनाम...', जेव्हा कंगना रणौतचं ठरलेलं लग्न मोडलं, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रणौत यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

कंगना रणौतकडून लग्नाबद्दल मोठा खुलासा, 'सासू - सासरे पळून गेले इतकं बदनाम...'
| Updated on: Sep 02, 2024 | 12:21 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत स्टारर Emergency सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री अनेक मोठ्या आणि धक्कादायक गोष्टींचा खुलासा करत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी स्वतःच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. होणारे सासू – सासरे घरी बसलेले असताना अशी काही परिस्थिती समोर आली, ज्यामुळे कंगना यांचे लग्न मोडलं.

नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना रणौत यांना खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘कोणत्या राजकारणी व्यक्तीसोबत लग्न करणार की कोणत्या अभिनेत्यासोबत?’ यावर कंगना यांनी मोठी खुलासा केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

प्रश्नाचं उत्तर देत कंगना म्हणाल्या, ‘आया याबद्दल मी काय सांगू… लग्नाबद्दल माझ्या मनात चांगले विचार आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक जोडीदार असावा… स्वतःचं छोटं कुटुंब असावं… असं मला देखील वाटतं. पण आता लोकांनी मला बदनाम करून ठेवलं आहे. माझं लग्न होऊ देत नाहीत…’

‘कोर्टात माझ्या विरोधात इतक्या केस सुरु आहे. कोणासोबत लग्नाची बोलणी सुरु असेल तर माझ्या घरी पोलीस येतात. मला सतत समन्स येत असतात…’ असं सांगत कंगना रनौत हिने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांची चर्चा रंगली आहे.

कंगना रनौत म्हणाल्या, ‘एकदा तर माझे होणारे सासू – सासरे माझ्या घरी आले होते आणि समन्स आला. त्याक्षणी पाहुणे माझ्या घरातून पळून गेले… यामुळे देखील माझं लग्न होत नाहीये… माझं बोलणं खोटं वाटेल पण हे सत्य आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केल्यानंतर कंगना यांनी राजकारणाकडे मोर्चा वळवला आहे.

कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणात प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.