AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिमांच्या धर्मात हस्तक्षेप आहे का? वक्फच्या प्रश्नावर कंगना राणौत यांचं स्पष्ट वक्तव्य

Kangana Ranaut on Waqf Amendment Bill: विरोधी पक्ष मुस्लिमांच्या धर्मात हस्तक्षेप आहे का? कंगना रणौत यांचं वक्फच्या प्रश्नावर स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या, 'कोणतीही धार्मिक संघटना कायद्याच्या किंवा संविधानाच्या...'

मुस्लिमांच्या धर्मात हस्तक्षेप आहे का? वक्फच्या प्रश्नावर  कंगना राणौत यांचं स्पष्ट वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Apr 04, 2025 | 11:15 AM
Share

Kangana Ranaut on Waqf Amendment Bill: वक्फ संशोधन विधेयकामुळे मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मुस्लिम समाजातील एक वर्ग या विधेयकाच्या विरोधात आहे. अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी वादग्रस्त विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरूवार, 3 एप्रिल रोजी संसद भवन संकुलात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, भ्रष्टाचार संपुष्टात येत आहे. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कायदा आणि संविधानापेक्षा मोठा नाही.

हिमाचाल प्रदेशातील मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत वक्फ संशोधन विधेयकाचं कौतुक करत म्हणाल्या, ‘कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कायदा आणि संविधानापेक्षा मोठा नाही. देशातील वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन आणि प्रशासन सुधारणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. हा ऐतिहासिक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच पाहायला मिळाला आहे. देशाच्या कायद्याशिवाय दुसरं काहीही मोठं नाही. स्वच्छता आंदोलन, भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन, अस्वच्छतेच्या विरोधात, ही सर्व कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाली आहेत. वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेली जमीन अनेक देशांच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे.’

विरोधकांना सडेतोड उत्तर

विरोधकांवर निशाणा साधत कंगना म्हणाल्या, ‘‘नियामक संस्था, डीसी, जिल्हा दंडाधिकारी देखरेख करतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणतंही बेकायदेशीर काम केलं तर कायदेशीर यंत्रणा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. या आधी देशाची काय स्थिती होती ते पहा. वर्षानुवर्षे रखडलेली सर्व कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.’

विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे का? यावर कंगना म्हणाल्या, ‘गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक स्पष्टपणे समजून सांगितलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की आखणी विस्ताराने सांगण्याची गरज नाही. कोणतीही व्यक्ती, कोणतीही संस्था, कोणतीही धार्मिक संघटना कायद्याच्या किंवा संविधानाच्या वर नाही. या देशाच्या संविधानाच्या वर कोणीही नाही… असं देखील कंगना राणौत म्हणाल्या आहेत.

कंगना राणौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ज्यामुळे कंगना यांना वादग्रस्त परिस्थितीचा देखील सामना करावा लागला आहे.

Follow Us
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका