AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सिन्हा यांनी मुलांना काय शिकवलं?’, संस्कारांवर बोट ठेवणाऱ्या मुकेश खन्नाला सोनाक्षीचं सडेतोड उत्तर

Sonakshi Sinha Slams Mukesh Khanna: पुन्हा माझ्या संस्कारांवर बोट ठेवलात तर विसरून जाईल..., सोनाक्षी सिन्हाच्या संस्कारांवर बोट ठेवणाऱ्या मुकेश खन्ना यांच्यावर भडकली अभिनेत्री, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या वक्तव्याची चर्चा...

'सिन्हा यांनी मुलांना काय शिकवलं?', संस्कारांवर बोट ठेवणाऱ्या मुकेश खन्नाला सोनाक्षीचं सडेतोड उत्तर
| Updated on: Dec 17, 2024 | 8:39 AM
Share

Sonakshi Sinha Slams Mukesh Khanna: ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने मुकेश खन्ना यांना खडेबोल सुनावले आहेत. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. ज्यावर उत्तर देत सोनाक्षीने देखील संताप व्यक्त केला आहे. खन्ना यांनी सोनाक्षीच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले होते आणि तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलीला दिलेल्या संस्कारांवर टिप्पणी केली होती. सोनाक्षीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे मुकेश खन्ना यांना चेतावनी दिली आहे. ‘पुन्हा माझ्या कुटुंबियांबद्दल काही म्हणालात तर त्यावर उत्तर देईल…’ असं अभिनेत्री म्हणाली.

काय आहे प्रकरण?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ च्या एका एपिसोडबद्दल चर्चा केली. ज्यामध्ये सोनाक्षीने ‘रामायण’ संबंधी विचारलेल्या एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं. यावर मुकेश खन्ना म्हणाले, सोनाक्षीने या प्रश्नाला चुकीचे उत्तर देण्याचे कारण म्हणजे तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा, ज्यांनी आपल्या मुलांना भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माशी संबंधित माहिती दिली नाही.

मुकेश खन्ना म्हणाले, ‘ही घटना शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलांवर केलेले संस्कार अपयशी ठरल्याचं दाखवत आहे. त्यांच्या मुलांना भारतीय संस्कृती आणि धर्म का शिकवला गेला नाही? मी सामर्थ्यवान असतो तर मुलांना बसवून भारतीय संस्कृती शिकवली असती…

मुकेश खन्ना यांना सोनाक्षीचं सडेतोड उत्तर

इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत सोनाक्षी म्हणाली, ‘नुकताच मी तुमचं वक्तव्य ऐकलं… ज्यामध्ये मी रामायणासंबंधी चुकीचं उत्तर दिल्यामुळे तुम्हा माझ्या वडिलांना जबाबदार ठरवलं…सर्व प्रथम, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की त्या दिवशी शोमध्ये दोन महिला होत्या ज्यांच्याकडे या प्रश्नाचे अचूक उत्तर नव्हतं, परंतु तुम्ही फक्त माझं नाव घेतलं. यावरून तुमचा वाईट हेतू स्पष्टपणे दिसून येतो.’

‘हा मान्य आहे, त्या दिवशी मला विसरायला झालं. जी एक सामान्य घटना आहे. राम यांचं जीवन आपल्याला माफ करा आणि विसरून जा… असं शिकवण देतं… जर राम मंथरा, कैकेयी आणि रावण यांना माफ करू शकतात तर तुम्ही का नाही?’

सोनाक्षीने मुकेश खन्ना यांना दिली चेतावनी

सोनाक्षी म्हणाली, ही घटना पुन्हा पुन्हा आठवून तुम्ही माझ्या आणि  कुटुंबावर नकारात्मक चर्चा करू नका, असा इशारा मुकेश खन्ना यांना दिला. आणि पुढच्या वेळी माझ्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर तुम्ही काही बोलाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच मी आज तुमच्यासोबत आदर आणि सन्मानाने बोलत आहे.

‘मला कोणतीही वादग्रस्त परिस्थीती निर्माण करायची नाही. पण जेव्हा माझ्या कुटुंबियांवर कोणी आक्रमन करेल, तर त्यांना मी विसरणार नाही आणि गप्प बसणार नाही. त्यामुळे मुकेश खन्ना यांनी आमच्या नावाचा वापर करत चर्चेत राहू नये…’ असं देखील सोनाक्षी म्हणाली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.