AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याच्या निधनानंतर सासूने हडपली संपत्ती, नाही झालं नवऱ्याचं अंतिम दर्शन, अभिनेत्रीचं खडतर आयुष्य

Bollywood Actress love life: अभिनेत्रीला शेवटच्या क्षणी देखील नाही पाहाता आला नवऱ्याचा चेहरा, त्याच्या निधनानंतर सासूने हडपली संपत्ती..., अभिनेत्रीने बॉलिवूडवर केलं राज्य, पण खासगी आयुष्यात सोसल्या यातना...

नवऱ्याच्या निधनानंतर सासूने हडपली संपत्ती, नाही झालं नवऱ्याचं अंतिम दर्शन, अभिनेत्रीचं खडतर आयुष्य
| Updated on: Nov 10, 2024 | 1:02 PM
Share

Bollywood Actress love life: बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत असते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणदे झीनत अमान… झीनत यांनी देखील खासगी आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला. झीनत यांनी दोन वेळा लग्न केलं. पण त्यांचे दोन्ही लग्न अपयशी ठरले. तर फक्त मुलासाठी त्यांनी 12 वर्ष यातना सहन केल्या. स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल खुद्द झीनत यांनी मोठा खुलासा केला.

झीनत यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं पहिलं लग्न 1978 मध्ये अभिनेते आणि फिल्म मेकर संजय खान यांच्यासोबत झालं होतं. पण त्याचं लग्न एक वर्ष देखील टीकलं नाही. नवऱ्याकडून अभिनेत्रीचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. यानंतर अभिनेत्रीने संजय खानपासून घटस्फोट घेतला. 1985 मध्ये झीनत यांनी मजहर खानसोबत दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नातही त्यांना वैवाहिक आयुष्याचा आनंद मिळाला नाही.

View this post on Instagram

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

एका मुलाखतीत झीनत यांनी मजहर खान सोबत लग्न केल्यानंतर आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. झीनत म्हणाल्या, ‘लग्नाच्या काही वर्षांनंतर मला कळलं की मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण कुटुंबियांच्या विरोधात जात लग्न केल्यामुळे मी लग्न टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला…’

‘गरोदर राहिल्यानंतर देखील नवऱ्याने माझी साथ दिली नाही.’ एक मॅगझीनच्या आर्टिकलनुसार, मजहर यांचं दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि हे सत्य देखील होतं. ‘नवऱ्याच्या प्रेमसंबंधांबद्दल कळल्यानंतर मला मोठा धक्का बसला. पण मुलाचा जन्म झाल्यानंतर मी लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा देखील मजहर याची वगणूक बदलत नव्हती…’

एवढंच नाही तर, मजहरपासून वेगळं झाल्यानंतरही मला माझ्या सासरच्या लोकांकडून खूप त्रास सहन करावा लागला. मजहरच्या आई आणि बहिणीने माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध केलं होतं. जेव्हा मजहरचा मृत्यू झाला तेव्हा सासरच्यांनी तिला तिच्या पतीचा चेहराही पाहू दिला नाही. शिवाय मजहर यांची सर्व प्रॉपर्टी आई आणि बहिणीने घेतली.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.