AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासरच्यांनी करीयर केलं उद्ध्वस्त, नवऱ्याने केली फसवणूक’, खडतर होतं गायिकेचं खासगी आयुष्य

तीन मुलांच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली साथ, तिन्ही मुलांची जबाबदारी खांद्यावर असलेल्या गायिकेचं खडतर आयुष्य, सासरच्यांनी तिचं करीयर केलं उद्ध्वस्त, नवऱ्याने केली फसवणूक...

सासरच्यांनी करीयर केलं उद्ध्वस्त, नवऱ्याने केली फसवणूक', खडतर होतं गायिकेचं खासगी आयुष्य
| Updated on: Jan 31, 2025 | 11:21 AM
Share

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका प्रसिद्ध गायिकेच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहे. सासरच्यांनी करियर उद्ध्वस्त केल्यानंतर पतीने देखील साथ सोडली. अशात तीन मुलांची जबाबदारी एकट्या गायिकेवर होती. सध्या ज्या गायिकेच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत, ती गायिका दुसरी तिसरी कोणी नसून कनिका कपूर आहे.

कनिका कपूर हिचं प्रोफेशनल आयुष्य फार उत्तम राहिलं आहे. ‘बेबी डॉल’, ‘चिटिया कलाईयां’ यांसारखी अनेक गाणि कनिका हिने गायली आहे. पण कानिकाचं खासगी आयुष्य मात्र फार खडतर होतं. सांगायचं झालं तर, लहानपणापासून कनिका हिला गाण्याची आवड होती. संगीत विश्वात तिला स्वतःचं करियर घडवायचं होतं. पण वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कनिकाचं लग्न झालं.

लग्नानंतर कनिका नवऱ्यासोबत लंडन याठिकाणी गेली. लग्नानंतर कनिका हिने तीन मुलांना जन्म दिला. कनिका दोन मुली आणि एका मुलाची आई आहे. एका जुन्या मुलाखतीत कनिका हिच्या सासरच्या मंडळींना तिच्यासमोर एक अट ठेवली होती.

लग्नानंतर कनिका प्रोफेशनली गाऊ शकत नाही… असं सासरच्यांनी सांगितलं. अशात कनिकाने घरातच सराव सुरु ठेवला. कनिया तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नव्हती. अखेर कनिकाने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नवरा कनिकाची फसवणूक करत होता… असं देखील अनेकादा समोर आलं. शिवाय कनिकाने नवऱ्याल रंगे हात पकडलं त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर कनिकाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कारण तीन मुलांची जबाबदारी तिच्या एकटीवर होती. मुलाखतीत कनिका म्हणाली, ‘माझ्याकडे पैसे नव्हते. घटस्फोटानंतर अत्यंत कठीण दिवसांचा सामना केला. वकील सारखे पैसे मागायचे. मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नव्हते. म्हणून त्यांना शाळेतून काढलं होतं.’

‘पण तेव्हा मला माझ्या आई आणि भावाने खूप मदत केली. माझे अनेक मित्र देखील माझ्यासोबत होते.’ असं देखील कनिका एका मुलाखतीत म्हणाली होती. पहिलं लग्न अयशस्व ठरल्यानंतर कनिकाने 2022 मध्ये दुसरं लग्न केलं. NRI उद्योजक गौतम हाखीरमणी याच्यासोबत कनिकाने लग्न केलं.

लग्नात गायिकेचा मुलगाच तिली मंडपापर्यंत घेऊन आला. तर दोन्ही मुली कनिका हिच्यासोबत होत्या. दुसऱ्या लग्नानंतर कनिका आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील कनिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.