AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा सर्वात दुर्दैवी सिनेमा; चित्रपटाला बनवायला 23 वर्ष,शुटींगदरम्यान 2 अभिनेते अन् दिग्दर्शकाचाही मृत्यू

बॉलिवूडचा असा एक चित्रपट जो सर्वात दुर्दैवी चित्रपट मानला जातो. कारण चित्रपट बनवेपर्यंत दो्न्ही अभिनेत्यांचा मृत्यू झाला, तसेच दिग्दर्शकाचाही मृत्यू झाला. हा कोणता चित्रपट आहे माहितीये?

बॉलिवूडचा सर्वात दुर्दैवी सिनेमा; चित्रपटाला बनवायला 23 वर्ष,शुटींगदरम्यान 2 अभिनेते अन् दिग्दर्शकाचाही मृत्यू
Bollywood Unluckiest Film,Love and God, 23 Years, 3 DeathsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2025 | 1:36 PM
Share

बॉलिवूडमध्ये 70-80 च्या चित्रपटांची मजा काही औरच होती. तेव्हाच्या कथा, गाणी काही वेगळेच असायचं. जुन्या चित्रपटांपैकी काही चित्रपट तर आजही तेवढ्याच आवडीने पाहिले जातात. प्रत्येक चित्रपटाची एक कहाणी होती. असाच चित्रपट ज्याबद्दल आजही बोलताना दु:ख व्यक्त केलं जातं. या चित्रपटाला बनवण्यासाठी 23 वर्ष लागली. या चित्रपटाशी संबंधित अनेक दुःखद घटना घडल्या, ज्यामध्ये तीन मुख्य पात्रांचा मृत्यू झाला.

चित्रपटाचं शुटींग अनेकदा थांबलं

या चित्रपटाचं नाव आहे “लव्ह अँड गॉड” आहे. जो पूर्ण होण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ लागला. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक के. आसिफ यांनी बनवला होता. हा चित्रपट लैला-मजनूच्या प्रेमकथेवर आधारित होता, ज्यामध्ये मजनूची भूमिका संजीव कुमार यांनी साकारली होती आणि लैलाची भूमिका निम्मीने साकारली होती. हा चित्रपट के. आसिफसाठी खास होता कारण तो त्यांचा पहिला रंगीत चित्रपट होता. चित्रपटाचे चित्रीकरण 1963 मध्ये सुरू झाले होते, परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट मध्येच थांबवावा लागला. यानंतर, 1970 मध्ये पुन्हा चित्रीकरण सुरू झाले, परंतु नंतर पुन्हा थांबलं आणि अखेर 1968 मध्ये चित्रपट पूर्ण झाला.

अचानक तिघांचा मृत्यू

चित्रपटाची सुरुवात गुरु दत्त यांच्यापासून होणार होती, मात्र त्याच्या पुढच्याच वर्षीच त्यांचे निधन झाले, ज्यामुळे शूटिंग चार वर्षे थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर 1970 मध्ये संजीव कुमार यांच्यासोबत पुन्हा शूटिंग सुरू झालं, पण 1971 मध्ये के. आसिफ, जे या चित्रपटाबद्दल खूप गंभीर होते, त्यांचही निधन झालं. त्यानंतर के. आसिफ यांच्या पत्नीने चित्रपट पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच संजीव कुमार यांचेही निधन झाले. हा चित्रपट नेहमीच त्याच्या कथेपेक्षा त्याच्या कठीण प्रवासासाठी आणि दुःखद घटनांसाठी अधिक लक्षात ठेवला जातो.त्यामुळे या चित्रपटाला बॉलिवूडचा सर्वात दुर्दैवी सिनेमा म्हटलं जातं.

पण नंतर अखेर अनेक अडचणींनंतर हा चित्रपट पूर्ण करण्यात आला. एकंदरीत या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी 23 वर्ष लागली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.