Deepti Naval | ‘दीप्ती नवल’ने सांगितले डिप्रेशनमध्ये जाण्याचे कारण, लग्नानंतर सर्व काही…
मला कळतच नव्हते की, माझी नेमकी चुक काय? मी सतत या गोष्टींचा विचार करते होते.
मुंबई : दिग्गज अभिनेत्री दीप्ती नवल हिने अनेक वर्षांनंतर आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीये. दीप्तीने सांगितले की, लग्न झाल्यानंतर तिला चित्रपटाच्या आॅफर येणे बंद झाले. हे सर्व काही अचानकच घडत होते. मला काही समजण्याच्यामध्येच खूप वेळ निघून गेला. मला कळतच नव्हते की, माझी नेमकी चुक काय? मी सतत या गोष्टींचा विचार करते होते. या सर्वांमध्ये मी काही दिवस डिप्रेशनमध्ये देखील गेले. अचानक काम मिळणे बंद झाल्यामुळे याचा परिणाम माझ्या आयुष्यावर देखील झाला.
दीप्ती नवलने बाॅलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये दीप्तीने दमदार भूमिका केल्या. इतकेच नाही तर एका मागून एक सतत चित्रपटांच्या आॅफर दीप्तीला येत होत्या.
दीप्तीने चित्रपट निर्माते प्रकाश झासोबत लग्न केले. परंतू हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि यांनी घटस्फोट घेतला. यादरम्यान बाॅलिवूडमधून दीप्ती फार दूर गेली.
यादरम्यानच्या काळात त्यामुळे तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दीप्तीने हे सर्व खुलासे केले. चित्रपटांच्या आॅफर येत नसल्याने आयुष्यामध्ये मोठे बदलही झाले.
दीप्ती म्हणाली की, मी आयुष्यात असा एक टाईम बघितला आहे की, माझ्याकडेच काहीच काम नव्हते. त्यावेळी मला हे कळतच नव्हते की, माझे नेमके काय चुक आहे, मी कुठे चुकले.
मी आयुष्यात अशी काही वर्ष बघितली आहे की, मला काम मिळत नव्हते. कितीतरी वर्ष मी चित्रपटाच्या आॅफरसाठी वाट पाहात होते. आता दीप्ती लवकरच गोल्डफिश या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.