AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartik Aaryan: ‘भुल भुलैय्या 2’च्या यशानंतर कार्तिक आर्यनने वाढवलं मानधन? उत्तर वाचून तुम्हीही हसाल!

या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता 150 कोटींकडे वाटचाल सुरू आहे. चित्रपटाला इतकं घसघशीत यश मिळाल्यानंतर आता कार्तिकने त्याच्या मानधनात (Fees) वाढ केल्याची चर्चा सुरू झाली.

Kartik Aaryan: 'भुल भुलैय्या 2'च्या यशानंतर कार्तिक आर्यनने वाढवलं मानधन? उत्तर वाचून तुम्हीही हसाल!
Kartik AaryanImage Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 10:59 AM
Share

अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता 150 कोटींकडे वाटचाल सुरू आहे. चित्रपटाला इतकं घसघशीत यश मिळाल्यानंतर आता कार्तिकने त्याच्या मानधनात (Fees) वाढ केल्याची चर्चा सुरू झाली. एखादा चित्रपट हिट ठरला की कलाविश्वात कलाकाराचा भाव वधारतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे कार्तिकनेही ‘भुल भुलैय्या 2’नंतर आपलं मानधन वाढवल्याचं म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर खुद्द कार्तिकनेच ट्विटरवर उत्तर दिलं आहे. एका वेबसाईटने त्याच्या मानधनाविषयी ट्विट केलं होतं. त्याला कार्तिकने आपल्याच मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.

‘भुल भुलैय्या 2 च्या यशानंतर कार्तिकने त्याची फी वाढवली आहे’, असं ते वृत्त होतं. त्यावर ट्विट करत कार्तिकने लिहिलं, ‘प्रमोशन झालंय आयुष्यात, पगारवाढ नाही. तथ्यहीन’. कार्तिकच्या या उत्तरावर अनेकांनी कमेंट्स केले आहेत. ‘मानधन वाढवण्यात काही गैर नाही, तू तसं काम केलंस’, असं एकाने लिहिलंय. तर काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा उत्तर-

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

भुल भुलैय्या 2 हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये कार्तिकसह कियारा अडवाणी आणि तब्बूचीही भूमिका आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 122.69 कोटींचा गल्ला जमवला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये पहिल्याच दिवशी दमदार कमाई करणाऱ्यांमध्ये ‘भुल भुलैय्या 2’चा समावेश झाला आहे. कार्तिक आर्यनच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाला ‘भुल भुलैय्या 2’ने मागे टाकलं आहे.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...