AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाहत्यांची 18 वर्षांची प्रतीक्षा संपणार, बॉलिवूडमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा तिसरा भाग येणार

आज आपण अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याची अनेक वर्षांपासून लोकं वाट बघत आहेत. या चित्रपटाचा तिसरा पार्ट कधी रिलीज होईल याची सगळे प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपटच खूप मजेशीर असून सर्वांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाची विशेष प्रतीक्षा ही क्लायमॅक्स सीनची असणार आहे.

चाहत्यांची 18 वर्षांची प्रतीक्षा संपणार, बॉलिवूडमधील 'या' सुपरहिट चित्रपटाचा तिसरा भाग येणार
हेराफेरी
| Edited By: | Updated on: Dec 21, 2024 | 12:40 PM
Share

आपल्या सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत जे पडद्यावर येतात आणि जातात आणि त्या चित्रपटांची चर्चा देखील जास्त होत नाही. त्यात काही चित्रपट असे असतात ज्यांच्या रिलीजनंतर चित्रपट पाहिल्यावर लोक दिवसरात्र त्यावर चर्चा करताना दिसतात. त्यानंतर त्या चित्रपटाचा पुढचा भाग येण्याची वाट पाहतात. अश्यातच आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो असाच एक चित्रपट आहे. ज्याच्या तिसरा भाग प्रदर्शित होण्याची लोकं खूप वाट पाहत आहेत. तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. हा चित्रपटच मजेदार तर आहेच, शिवाय विशेष प्रतीक्षा ही क्लायमॅक्स सीनची असणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टचा शेवट एवढ्या रोमांचक वळणावर झाला की प्रेक्षक तो सीन कधीच विसरू शकणार नाहीत. आणि इतक्या वर्षांनंतरही त्या वेळेस नेमकी काय घडले हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत.

कोणता आहे हा चित्रपट आणि त्यातील शेवटचा सीन?

१८ वर्षांपासून प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असलेला चित्रपट तो म्हणजे फिर हेरा फेरी. हा चित्रपट हेराफेरी चित्रपटाचा सिक्वेल होता. तसेच तुम्हा सगळ्यांना या चित्रपटाचा शेवटचा सीन कोणता होता हे नक्कीच आठवत असेल. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये अक्षय कुमार एका पुलाच्या कठड्यावर अडकलेला दिसत आहे. कारण या सीनमध्ये परेश रावल व सुनील शेट्टी यांनी अक्षय कुमारला फोन करताना दिसत आहे. त्यामुळे अक्षय कुमार हा पुलाच्या कठड्यावर फोन उचलनाच्या नादात तर दुसरीकडे हातात असलेलं सामान पुलाच्या खाली वाहत्या पाण्यात पडू नये यासाठी होणारी कसरत यात दिसत आहे. सामान वाचवण्याच्या नादात फोन थेट पाण्यात पडेल की हातातले सामान याचा व त्यानंतर काय होईल याचा खुलासा चित्रपटाच्या तिसऱ्या भागातच होणार आहे.

तिसऱ्या भागाची तयारी जोरात

फिर हेरा फेरी या चित्रपटाचा तिसरा भाग २०२५ मध्येच प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २००० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, असरानी आणि गुलशन ग्रोव्हर सारखे कलाकारही होते. तर २००६ साली हेरा फेरी 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात मुख्य कलाकारांव्यतिरिक्त जॉनी लिव्हर, बिपाशा बसू आणि रिमी सेन देखील दिसले होते. तर येणाऱ्या आगामी चित्रपटात नेमकी काय घडणार आहे. याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे चाहते आता या चित्रपटाचा तिसरा पार्ट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.