AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

S. D. Burman Birth Anniversary | राजमहाल आणि गादी सोडून संगीत क्षेत्रात आले नि संगीताचे बादशहा बनले एस. डी. बर्मन!

कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एस. डी बर्मन यांनी संगीत जगतात प्रवेश केला. तथापि, त्याची संगीताची आवड लहानपणापासूनच होती. राजा असण्याव्यतिरिक्त, बर्मन दांचे वडील सुप्रसिद्ध सितार वादक आणि ध्रुपद गायक होते.

S. D. Burman Birth Anniversary | राजमहाल आणि गादी सोडून संगीत क्षेत्रात आले नि संगीताचे बादशहा बनले एस. डी. बर्मन!
SD Burman
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 7:48 AM
Share

मुंबई : सचिन देव बर्मन म्हणजेच एसडी बर्मन (S. D. Burman) यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1906 रोजी बंगाल प्रेसिडेन्सीच्या कोमिला येथे झाला. हा भाग एकेकाळी त्रिपुराचा भाग होता, हा प्रदेश आता बांगलादेशचा भाग आहे. एस.डी. बर्मन यांचा जन्म त्रिपुरा राजघराण्यात झाला होता, त्यामुळे त्यांचे राजपुत्राप्रमाणे संगोपन झाले. वडील, त्रिपुराचे राजा इशान चंद्र देव बर्मन यांचे सचिन हे कनिष्ठ पुत्र होते. एसडी बर्मन एकूण नऊ भावंडांसह मोठे झाले.

कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एस. डी बर्मन यांनी संगीत जगतात प्रवेश केला. तथापि, त्याची संगीताची आवड लहानपणापासूनच होती. राजा असण्याव्यतिरिक्त, बर्मन दांचे वडील सुप्रसिद्ध सितार वादक आणि ध्रुपद गायक होते. त्याने संगीताचे बारकावे त्यांनी वडिलांकडून शिकले. संगीताचे औपचारिक शिक्षण घेतलेले एस.डी. फक्त निवडक गाण्यांना आपला उत्तम सूर द्यायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एस डी बर्मन कधीच त्यांच्या सुरांची पुनरावृत्ती करत नसत.

1938 मध्ये सचिन देव बर्मन यांनी गायिका मीरा यांच्याशी लग्न केले. एक वर्षानंतर त्यांचा मुलगा राहुल देव बर्मनचा जन्म झाला. त्याच्या वडिलांप्रमाणे, राहुल देव बर्मन देखील नंतर एक प्रसिद्ध संगीतकार बनले. शोले चित्रपटातील ‘मेहबूबा-मेहबूबा’ हे हिट गाणे राहुल देव बर्मन यांनी तयार केलेले आहे.

अनेक नावांनी प्रसिद्ध

एस. डी. बर्मन संगीत प्रेमींमध्ये अनेक नावांनी ओळखले जात होते. मुंबईत आणि बंगालमध्ये त्यांना ‘बर्मन दा’ आणि बांगलादेशमध्ये ‘शोचिन देब बर्मन’, बॉलिवूड संगीतकारांमध्ये ‘बर्मन दा’ आणि चाहत्यांमध्ये एसडी बर्मन आणि ‘जीन्स’ म्हणून ओळखले जात होते. एस.डी. बर्मन हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक होते. त्यांनी रचलेले संगीत लोकगीते आणि शास्त्रीय संगीताच्या स्पर्शाने वैविध्यपूर्ण होते.

बर्मन दा यांचे ‘पेइंग गेस्ट’ चित्रपटातील ‘छोड दो आंचल, जमाना क्या कहगा’, ‘सर जो तेरा चक्रे’, ‘प्यासा’ चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना’ हे गाणे गायली आहेत. ‘ज्वेल थीफ’ चित्रपटामध्ये ‘ये दिल ना होता बेचरा’ सारखी अनेक अप्रतिम आणि संस्मरणीय गाणी त्यांनी दिली आहेत.

संगीतासाठी घरदार त्यागले!

वडील राजा ईशान चंद्र देव बर्मन यांच्या मृत्यूनंतर, एस डी बर्मन यांनी आपले घर आणि शाही ऐश्वर्य सोडले आणि आसाम आणि त्रिपुराच्या जंगलात अनेक दिवस फिरले. येथे त्यांनी बंगाल आणि आसपासच्या प्रदेशातील लोकसंगीताचे बारकाईने निरीक्षण केले आणि जाणून घेतले. यानंतर, बर्मन दा यांनी उस्ताद आफताबुद्दीन खान यांना आपले गुरु बनवले आणि त्यांच्याकडून बासरी वाजवण्याचे शिक्षण घेतले.

संघर्षमय प्रवास

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी, एसडी बर्मन यांनी ईशान्य लोकसंगीत कार्यक्रमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली जी रेडिओवर प्रसारित केली गेली. 1930 पर्यंत एस डी बर्मन यांनी रेडिओच्या माध्यमातून लोक गायक म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. 1933 मध्ये ‘यहुदी की लडकी’ या चित्रपटात त्यांना गाण्याची संधी मिळाली, पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हे गाणे चित्रपटातून वगळण्यात आले. सुमारे 10 वर्षांनंतर त्यांना मुंबईत येण्याची संधी मिळाली आणि येथून त्यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला.

1944 मध्ये मुंबईत आल्यानंतरही त्यांना 2 वर्षे बॉलिवूडमध्ये कोणतेही काम मिळाले नाही. 1946 मध्ये त्यांना ‘8 डेज’ चित्रपटात संगीतकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, पण त्यांच्या संगीताला मान्यता मिळाली नाही.

पुढच्याच वर्षी त्यांना ‘दो भाई’ चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी गायिका गीता दत्त यांची भेट घेतली. गीता दत्त यांनी त्यांच्या मधुर आवाजात या चित्रपटातील ‘मेरा सुंदर सपना बीत गया …’ हे गाणे गायले. हे गाणे हिट झाले आणि लोकांना संगीतकार म्हणून प्रथमच एस.डी. बर्मन यांची ओळख झाली. यानंतर बर्मन दा यांनी एकापेक्षा एक हिट गाणी दिली. ‘साजन सावन’, ‘एक लडकी भीगी भागि सी’, ‘है अपना दिल तो आवारा’, ‘छोड दो आंचल जमाना क्या कहतेगा’, ‘मेरे सपनो की रानी’ अशी काही संस्मरणीय गाणी त्यांच्या सुमधुर संगीताने गाजली.

मोठ्या कलाकारांसोबत काम

बर्मन दा यांनी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध गायक आणि सर्वोत्कृष्ट गीतकारांसोबत काम केले आहे. देव आनंद, गुरु दत्त आणि बिमल राय यांच्या चित्रपटांमध्ये दिलेले बर्मन दा यांचे संगीत त्यांना नवीन उंचीवर घेऊन गेले. एस. डी. बर्मन यांना 1954 मध्ये रिलीज झालेल्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’ चित्रपटासाठी आणि 1973 साली ‘अभिमान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 1975 मध्ये रिलीज झालेल्या ‘मिली’ चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करताना एस. डी. बर्मन बेशुद्ध पडले. या घटनेनंतर काही दिवसांनीच 31 ऑक्टोबर 1975 रोजी सचिन देव बर्मन हे जग सोडून गेले.

हेही वाचा :

Radheshyam : ‘राधेश्याम’ येणार आपल्या ठरलेल्या तारखेलाच; मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित!

Anvita Phaltankar : ‘रिमझिम गिरे सावन…’, स्वीटू अर्थात अन्विता फलटणकरचं पावसात फोटोशूट

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...