AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pathaan Movie Controversy | पठाण चित्रपटाच्या वादावर शाहरुख खान याने अखेर दिली प्रतिक्रिया, म्हणाला चित्रपट हा…

फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच नाहीतर चित्रपट रिलीज झाल्यानंतरही SRK सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला.

Pathaan Movie Controversy | पठाण चित्रपटाच्या वादावर शाहरुख खान याने अखेर दिली प्रतिक्रिया, म्हणाला चित्रपट हा...
| Updated on: Jan 30, 2023 | 7:45 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत असताना आज मीडियासमोर येत शाहरुख खान याने अनेक चर्चांवर स्पष्टीकरण दिले. पठाण चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाल्यानंतर शाहरुख खान किंवा पठाण चित्रपटाची टीम चित्रपटाचे प्रमोशन करताना अजिबात दिसली नाही. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. SRK सेशनमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. यावेळी एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, सर चार दिवसांपूर्वीच माझे लग्न झाले आहे. मग मी हनीमूनला जाऊ की, पठाण चित्रपट बघायला. यावर शाहरुख खान याने एकदम खास उत्तर देत म्हटले होते की, अगोदर तू पठाण चित्रपट बघायला जा आणि मग हनीमूनला जा…SRK सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच नाहीतर चित्रपट रिलीज झाल्यानंतरही SRK सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला.

मुळात म्हणजे पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद सुरू होता. देशामध्ये अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी दिली.

पठाण या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले होते. सोशल मीडियावरही पठाण चित्रपटाच्या विरोधात एक वातावरण बघायला मिळत होते.

पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद सुरू असतानाच शाहरुख खान किंवा पठाण चित्रपटातील कोणत्याच कलाकाराने या वादावर काहीच भाष्य केले नव्हते. मात्र, आता यावर शाहरुख खान याने मोठे वक्तव्य केले आहे.

शाहरुख खान याने कोणाचेही नाव न घेता काही गोष्टी स्पष्ट केल्या. मात्र, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान याला मोठे टेन्शन होते हे स्वत: शाहरुख खान याने सांगितले आहे.

शाहरुख खान म्हणाला की, मी सत्तेत असलेल्या लोकांशी बोललो आणि चित्रपट सर्वत्र शांततेत प्रदर्शित होईल याची खात्री अगोदर केली. चित्रपट शांततेत रिलीज व्हावा, ही मला मोठी काळजी होती.

मुळात म्हणजे चित्रपट ही काही मोठी गोष्ट नाही, ती फक्त करमणूक आहे. सगळे सुरळीत व्हावे असे मला सुरूवातीपासूनच वाट होते आणि तसेच झाल्याने मोठा आनंद देखील झाला.

शाहरुख खान पुढे म्हणाला, मी प्रत्येक धर्मासाठी चित्रपट बनवतो. चित्रपट कोणत्याही भाषेतील असो…एकच कायमच ठरलेले असते की, आम्ही आमच्या पात्रामधून सर्वांचे मनोरंजन करू…कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही…

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.