AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर समोर आलं तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण; जाणून धक्का बसेल

नुकतंच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा या लोकप्रिय जोडीचा ब्रेकअप झाला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लवकरच लग्न करणार असल्याचं म्हणत असतानाच यांच्या ब्रेकअपच्या बातमीमुळे चाहत्यांना नक्कीच धक्का बसला होता. सोबतच नक्की त्यांचा ब्रेकअप का झाला? हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. आता यांच्या ब्रेकअपचं कारण समोर आलं आहे.

अखेर समोर आलं तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण; जाणून धक्का बसेल
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Mar 06, 2025 | 5:32 PM
Share

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या ब्रेकअपची गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दोघांनीही 2022 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. चाहत्यांना दोघांमधील सुंदर केमिस्ट्री देखील आवडली. नातं उघड केल्यानंतर दोघेही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. ही लोकप्रिय जोडी लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण मग दोघांमध्ये असं काय झालं की, त्यांनी नाते संपवण्याचा निर्णय घेतला? त्यांच्या ब्रेकअपची बातमी आल्यापासून लोकांच्या मनात हाच प्रश्न घोळत आहे. आता त्यांचं वेगळं होण्याचं कारण समोर आलं आहे, जे की धक्कादायक आहे.

डिसेंबर 2024 मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्याबद्दल असे वृत्त आले होते की हे जोडपे लवकरच लग्न करू शकते आणि लग्नानंतर दोघेही मुंबईत एक घर खरेदी करतील. पण ब्रेकअपच्या बातमीने या सर्वांनाच पूर्णविराम दिला. आता या दोघांनीही त्यांचे नाते संपवून एकमेकांचे चांगले मित्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकअपचे कारण काय?

एका रिपोर्टनुसार तमन्ना आणि विजय यांच्यात लग्नाचा विषय आल्यापासून दुरावा निर्माण झाला. रिपोर्ट्सनुसार, तमन्ना 30 वर्षांची आहे. ती विजयसोबत लग्न करण्याबाबत फार उत्साहित होती आणि तिला हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा होता. पण यावरून त्यांच्यात वादही होत होते असंही म्हटलं जात आहे. वारंवार होत असलेले मतभेद त्यांच्या ब्रेकअपचं कारण बनलं असल्याचं म्हटलं जात आहे. पण हे एका रिपोर्टनुसार सांगितलं जात आहे. नेमकं हेच कारण आहे की अजून काही यावर मात्र दोघांनीही भाष्य केलेलं नाही.

एकमेकांना डेट करायला कधी सुरुवात केली?

सूत्रांनी सांगितले की, ‘तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा काही आठवड्यांपूर्वीच एकमेकांपासून वेगळे झाले होते, परंतु त्यांनी या नात्याचा आदर करत एकमेकांचे चांगले मित्र राहण्याचा विचार केला आहे. दोघेही आपापल्या प्रोजेक्टमध्ये, कामात व्यस्त आहेत. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी 2022 मध्ये डेटिंग सुरू केली. ते जून2023 मध्ये प्रीमियर झालेल्या नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये सुजॉय घोषच्या सेगमेंटमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर तमन्नाने अखेर एका मुलाखतीत त्यांच्या नात्याची पुष्टी केली.

‘मला असे निर्बंध आवडत नाहीत’

दरम्यान ते जेव्हा रिलेशनमध्ये होते तेव्हा त्याबद्दल विजय वर्माने सांगितले होते की त्यांना त्यांच्या भावना आता लपवायच्या नाहीयेत. म्हणून त्यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली असल्याचं त्याने म्हटलं होतं.

एका मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला होता की, “जर आम्हाला एकत्र वेळ घालवायला आवडत असेल आणि आम्ही एकमेकांना आवडत असू तर ते लपवण्याची गरज नाही. यावर आम्ही दोघेही सहमत होतो असं मला वाटतं. आणि नाते लपवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तुम्ही एकत्र बाहेर जाऊ शकत नाही, तुमचे मित्र तुमचे फोटो काढू शकत नाहीत. मला असे निर्बंध आवडत नाहीत.” असं स्पष्ट मत त्यांने व्यक्त केलं होतं.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....