AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटावरील बॉयकॉट ट्रेंडवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे भाष्य, म्हणाले…

चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social media) पठाण चित्रपटाच्या विरोधात देखील बॉयकॉट ट्रेंड सुरू होता.

चित्रपटावरील बॉयकॉट ट्रेंडवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे भाष्य, म्हणाले...
| Updated on: Jan 27, 2023 | 4:06 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाॅलिवूड चित्रपटांच्या विरोधात बॉयकॉट ट्रेंड (Boycott trend) सुरू आहे. याचा आतापर्यंत अनेक चित्रपटांना मोठा झटका देखील बसलाय. यामध्ये आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा असो किंवा अक्षय कुमार याचा रक्षा बंधन असो. या बॉयकॉट ट्रेंडमुळे बाॅलिवूडचे अनेक चित्रपट (Movie) फ्लाॅप गेल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान हा कोणत्याही पार्टीमध्येही सहभागी होताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सतत बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा नुकताच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट या सर्वांना अपवाद नक्कीच ठरलाय. चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social media) पठाण चित्रपटाच्या विरोधात देखील बॉयकॉट ट्रेंड सुरू होता. मात्र, याचा काहीच फरक पठाण चित्रपटाला बसला नसल्याचे दिसतंय. उलट चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केलीये.

नुकताच बॉयकॉट ट्रेंडवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी परखड मत मांडले आहे. बॉयकॉट ट्रेंडवर आपले मत मांडताना हे व्हायला नाही हवे असेही अनुराग ठाकुर यांनी म्हटले आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे खूप जास्त नुकसान होत असल्याचे देखील अनुराग ठाकुर यांनी म्हटले. एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहेत.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटले की, आपले चित्रपट जगभरात नाव करत आहेत. परंतू बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटांवर परिणाम होतो. वातावरण खराब करण्यासाठी बऱ्याच वेळा लोक काही माहिती नसताना देखील कमेंट करतात. यामुळे मोठे नुकसान होते, हे व्हायला नको.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कार्यकारणी बैठकीमध्ये नेत्यांना चित्रपटाच्या विरोधात बोलताना विचार करण्याचा सल्ला दिला होता. बाॅलिवूडचे चित्रपट फक्त बॉयकॉट ट्रेंडमुळे फ्लाॅप जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळेच फटका बाॅलिवूड चित्रपटांना बसत आहे.

आमिर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंह, कतरिना कैफ, जान्हवी कपूर यांचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. आता अनुराग ठाकुर यांनी देखील यावर मत मांडले आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.