सून म्हणून आलीस आणि वेश्या होऊन…, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘या’ सिनेमामुळे उडालेली सर्वत्र खळबळ
दिवंगत दिग्दर्शक बी.आर. चोप्रा दिग्दर्शित असा एक सिनेमा ज्याबद्दल डिस्ट्रीब्यूटर्समध्ये देखील भीती निर्माण झाली होती. सिनेमाची घोषणा करताच इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. एवढंच नाही तर, अनेक डिस्ट्रीब्यूटर्स पत्र लिहित म्हणालेले, 'तुम्ही आम्हाला संपवत आहात का? आपण सर्व मरुन जाऊ...

‘महाभारत’ या मालिकेबद्दल आज काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शत बलराज चोप्रा म्हणजेच बी.आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका आजही चर्चेत असते. बी.आर. चोप्रा यांनी फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नाही तर, मनोरंजनाला सामाजिक मुद्द्यांची जोड देखील दिली. त्यांची कारकीर्द सामाजिक विचार, अर्थपूर्ण कथा आणि धाडसी विषयांनी भरलेली होती. जरी ते आता या जगात नसले तरी, त्यांचे सिनेमे आणि ‘महाभारत’ ही टीव्ही मालिका लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. 1955 मध्ये चोप्रा यांनी ‘बीआर फिम्स’ नावाने प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती केली आणि त्यांनी सिनेमांच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांपर्यंक सामाजिक संदेश पोहोचवण्याचं काम केलं.
‘नया दौर’, ‘गुमराह’, ‘कानून’, ‘हमराज’, ‘निकाह’, ‘कर्म’ यांसारख्या बी. आर. चोप्रा यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडलं. ‘भूतनाथ’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला… पण 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘साधना’ सिनेमाने सर्वत्र खळबळ उडाली होती. सिनेमाच्या कथा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर आधारित होती. सिनेमात अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी चंपा… या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. ती मोहन (सुनील दत्त) नावाच्या एका कॉलेज प्राध्यापकाच्या प्रेमात पडते.
या सिनेमात वेश्यांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज यावर भाष्य करण्यात आलं होतं. सिनेमाच्या घोषणेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. अनेक डिस्ट्रीब्यूटरनी चोप्रा यांनी पत्र लिहून विचारलं, “तुम्ही हे काय करत आहात? आम्ही सगळे मरून जाऊ.”
याबद्दल स्पष्टीकरण बी.आर. चोप्रा यांनी एका मुलाखतीत दिलेलं. अनेकांनी चोप्रा यांना समजावलं की, आतापर्यंत अनेकांनी वेश्यांच्या आयुष्यावर सिनेमे बनवले आहेत आणि ते फ्लॉप ठरले… ‘नर्तकी’, ‘राज नर्तकी’, ‘पूर्णिमा’ आणि ‘सेवा सदन’ यांसारख्या सिनेमांकडे सर्वांना पाठ फिरवली. एका डिस्ट्रीब्यूटरने बी. आर. चोप्रा यांना थेट विचारलं होतं की, ‘चार सिनेमे फ्लॉप ठरले आहे तुम्हाला वाटतं तुमचा सिनेमा चालेल?’
यावर बी, आर चोप्रा शांततेत म्हणालेले, ‘जेव्हा मी माझा पहिला सिनेमा बनवला तेव्हा सुद्धा मला माहिती नव्हतं, की माझा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही. मला कथा आवडली म्हणून मी सिनेमा केला. या सिनेमाची कथा मला आवडली म्हणून मी सिनेमा करत आहे… ‘
तू या घरची सून म्हणून आली आहेस, वेश्या म्हणून बाहेर जाऊ शकत नाही.
मूळ कथेचा शेवट वेगळा होता, ज्यात मंदिरात प्रवचन ऐकल्यानंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचे विचार बदलतात, परंतु चोप्रा यांना वाटले की, यामुळे सामाजिक पैलू नाहीसा होईल. त्यांनी लेखक पंडित मुखराम शर्मा यांना सांगितलं, शेवट असा असावा की आई आपल्या मुलीचा हात धरून म्हणेल, “तू या घरात सून म्हणून आली आहेस, वेश्या म्हणून जाऊ शकत नाहीस.” हाच शेवट ठेवण्यात आला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मराठा मंदिरमध्ये महिलाची गर्दी होण्यास सुरूवात झाली.
