AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानसोबत ब्रेकअप, ऐश्वर्या राय का राहिली शांत? लव्हस्टोरीचं मोठं रहस्य उलगडलं

Salman Khan - Aishwarya Rai Breakup : सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याचा वाईट अंत, ब्रेकअपनंतर का गप्प पाहिली ऐश्वर्या राय? लव्हस्टोरीचं 'ते' मोठं रहस्य उलगडलं, आजही दोघांचं नातं कोणत्यान कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

सलमान खानसोबत ब्रेकअप, ऐश्वर्या राय का राहिली शांत? लव्हस्टोरीचं मोठं रहस्य उलगडलं
फाईल फोटो
| Updated on: Oct 24, 2025 | 8:37 AM
Share

Salman Khan – Aishwarya Rai Breakup : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत होते. दोघांच्या नात्याची सुरुवात तर चांगली झाली, पण दोघांच्या नात्यांचा अंत अत्यंत वाईट होता आणि त्याची चर्चा देखील तुफान रंगली. एवढंच नाही तर, ऐश्वर्याला सलमानच्या नावाची देखील चीड येत होती. त्याच्या सावलीपासून ऐश्वर्या दूर जाऊ लागली होती. पण एक प्रश्न देखील कायम मनात येतो आणि तो म्हणजे, ऐश्वर्या त्यांच्या नात्यबद्दल का काही बोलली नाही. नुकताच झालेल्या मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी ऐश्वर्या – सलमान यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला.

सलमान खान ब्रेकअप झाल्यानंतर का गप्प राहिली ऐश्वर्या राय?

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याचा अंत अत्यंत वाईट झाला. सलमान खान याच्यावर अनेक आरोप करण्यात आले. सलमान, ऐश्वर्या हिला कायम नियंत्रणात ठेवायचा, अभिनेता ऐश्वर्यासाठी प्रचंड पझेसिव्ह होता.. एवढंच नाही तर, सलमान याने ऐश्वर्याला मारहाण देखील केली… असं देखील सांगण्यात आलं होतं. दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण सलमान आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच खुलासा केला नाही.

चित्रपट निर्माते प्रल्हाद कक्कर यांनी दोघांच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. प्रल्हाद म्हणाले, ऐश्वर्या अत्यंत पर्सनल व्यक्ती आहे… तिला असं वाटतं तिची पर्सनल लाईफ फक्त तिची पर्सनल लाईफ आहे.. तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींसोबतच ती मनातील गोष्ट शेअर करते. पत्रकार परिषदेत बोलायला देखील ऐश्वर्याला आवडत नाही. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झालं तेव्हा देखील ऐश्वर्या काहीही बोलली नाही…’ सांगायचं झालं तर, आजपर्यंत ऐश्वर्या हिने कधीच सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केलेलं नाही.

यावेळी प्रल्हाद कक्करने सलमानबद्दल जास्त काही सांगितलं नाही, पण त्याने निश्चितपणे सांगितलं की, सलमान एक ‘डिफिकल्ट’ अभिनेता आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हल दिल दे चुके समन’ सिनेमाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. काही वर्ष दोघे एकत्र देखील राहिले. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं ब्रेकअप झालं.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत